शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

मुक्या जनावरांची तहान भागवायची कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 19:43 IST

कळवण : शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडण्या तोडण्यात आल्याने मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी देता येत नाही. वीज खंडीत झाल्यास शेतीचे नुकसान होत असल्यामुळे नवीबेज परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून वीज पुरवठा तोडल्याने त्याचे पडसाद उमटत आहेत. रोहित्रावरील वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे मुक्या जनावरांची तहान भागवायची कशी असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करु नका अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कळवण : शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडण्या तोडण्यात आल्याने मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी देता येत नाही. वीज खंडीत झाल्यास शेतीचे नुकसान होत असल्यामुळे नवीबेज परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून वीज पुरवठा तोडल्याने त्याचे पडसाद उमटत आहेत. रोहित्रावरील वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे मुक्या जनावरांची तहान भागवायची कशी असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करु नका अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.नवीबेज येथे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन आंबेडकर, अभियंता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांसमवेत बैठक झाली. कंपनीने वीज बिल वसुली नावाखाली वीजतोडणी सुरू केली असून त्याचे पडसाद उमटले. वीजबिलाची थकबाकी आहे. त्यासाठी कंपनीचे कर्मचारी थेट रोहित्राचा वीजपुरवठा खंडीत करीत आहेत. याचा परिणाम शेतीवर होत आहे.त्यामुळे नियमित वीज बिल भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाल्यास जबाबदार धरण्यात येऊन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा माजी सरपंच चंद्रकांत पवार यांनी दिला.पाणी असून वीज नसल्याने पाणी देता येत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत न करता सुरळीत करण्याची मागणी देविदास पवार, कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष घन:श्याम पवार यांनी केली. वीजतोडणीची मोहिम केली जात असल्याने मुकी जनावरे तहानाने व्याकूळ होऊ लागली आहेत . त्यामुळे वीज खंडीत करु नये अशी मागणी शेतकरी वर्गातून झाली. अशोक पवार, प्रभाकर निकम, चंद्रकांत पवार, विनोद खैरनार, पोपट पवार, साहेबराव पवार, प्रकाश खैरनार, नरेंद्र वाघ, सतीश निकम, प्रवीण महाजन, प्रवीण गांगुर्डे, प्रभाकर पवार, समाधान पवार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Farmerशेतकरीgram panchayatग्राम पंचायत