शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

मुक्या जनावरांची तहान भागवायची कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 19:43 IST

कळवण : शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडण्या तोडण्यात आल्याने मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी देता येत नाही. वीज खंडीत झाल्यास शेतीचे नुकसान होत असल्यामुळे नवीबेज परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून वीज पुरवठा तोडल्याने त्याचे पडसाद उमटत आहेत. रोहित्रावरील वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे मुक्या जनावरांची तहान भागवायची कशी असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करु नका अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कळवण : शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडण्या तोडण्यात आल्याने मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी देता येत नाही. वीज खंडीत झाल्यास शेतीचे नुकसान होत असल्यामुळे नवीबेज परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून वीज पुरवठा तोडल्याने त्याचे पडसाद उमटत आहेत. रोहित्रावरील वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे मुक्या जनावरांची तहान भागवायची कशी असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करु नका अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.नवीबेज येथे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन आंबेडकर, अभियंता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांसमवेत बैठक झाली. कंपनीने वीज बिल वसुली नावाखाली वीजतोडणी सुरू केली असून त्याचे पडसाद उमटले. वीजबिलाची थकबाकी आहे. त्यासाठी कंपनीचे कर्मचारी थेट रोहित्राचा वीजपुरवठा खंडीत करीत आहेत. याचा परिणाम शेतीवर होत आहे.त्यामुळे नियमित वीज बिल भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाल्यास जबाबदार धरण्यात येऊन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा माजी सरपंच चंद्रकांत पवार यांनी दिला.पाणी असून वीज नसल्याने पाणी देता येत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत न करता सुरळीत करण्याची मागणी देविदास पवार, कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष घन:श्याम पवार यांनी केली. वीजतोडणीची मोहिम केली जात असल्याने मुकी जनावरे तहानाने व्याकूळ होऊ लागली आहेत . त्यामुळे वीज खंडीत करु नये अशी मागणी शेतकरी वर्गातून झाली. अशोक पवार, प्रभाकर निकम, चंद्रकांत पवार, विनोद खैरनार, पोपट पवार, साहेबराव पवार, प्रकाश खैरनार, नरेंद्र वाघ, सतीश निकम, प्रवीण महाजन, प्रवीण गांगुर्डे, प्रभाकर पवार, समाधान पवार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Farmerशेतकरीgram panchayatग्राम पंचायत