देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी नागरीकांचे नेमके आर्थिक बजेट कसे कोलमडते? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.गतवर्षी दुष्काळामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई होती. पावसाला उशीर झाल्यामुळे खरीप पीकांच्या लागवडीला उशीर झाला. यामुळे रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवडीला देखील उशीर होऊन कांदा पीकाला अंतिम टप्प्यात पाणी देतांना पाणीटंचाई निर्माण होउन पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला कांदा अनेक शेतकºयांना सोडून द्यावा लागला व शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.गतवर्षी कांदा लागवडीसाठी व काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने परवडत नसतांना देखील नाईलाजाने इतर तालुक्यातून मजूर आणावे लागल्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. हया मजुरांना त्यांच्या मजुरीचे पैसे देण्यासाठी कांद्याचे दर कोसळलेले असतांना तोटा खाऊन अनेक शेतकºयांना कांदे विकावे लागले होते.मजूर टंचाईमुळे शेतातून कांदा वेळेवर काढला गेला नाही. त्यातच वाढलेल्या उष्णतामानाचा परीणाम होउन चाळीत साठवलेला कांदा बºयाच प्रमाणात खराब झाला आहे. चाळीत साठवलेला कांदा सडल्यामुळे व वजनात येणारी घट यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होते.गत दोन वर्षांपासून कांदा पीकात नुकसान सहन करणाºया शेतकºयांना चालू वर्षी दोन पैसे पदरात पडून थोडीफार मागील नुकसानाची भरपाई होत आहे.हि बाब शहरातील नागरीकांनी समजून घ्यावी. कांद्याचे भाव कोसळतात त्या वेळी हया शेतकºयांवर काय अरीष्ट येते याचा कोणी विचार करत नाही, अशी भावना बंडू अहेर या कांदा उत्पादक शेतकºयाने व्यक्त केली आहे.केवळ शहरी भागातील ग्राहकांच्या मानसिकतेतून कांदा हा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून सरकार कांदा दरावर नियंत्रण ठेवते. कांदा दर वाढू नये म्हणून निर्यात धोरणात धरसोड वत्तीचे परीणाम शेतकºयांना सातत्याने भोगावे लागत आहेत.अशा स्थितीत कांदा उत्पादक शेतकºयांचे भविष्य निसर्ग व सरकारी यंत्रणा यांच्या लहरीपणावर अवलंबून असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कांदा भाववाढीमुळे बजेट कसे कोलमडते !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 20:14 IST
देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी नागरीकांचे नेमके आर्थिक बजेट कसे कोलमडते? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.
कांदा भाववाढीमुळे बजेट कसे कोलमडते !
ठळक मुद्देदेवळा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रि या