शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
2
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
3
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
4
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
5
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
6
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: “हे आम्ही खपवून घेणार नाही”; मतदान केल्यावर राज ठाकरेंचा इशारा
7
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
8
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
9
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
10
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
11
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
12
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
13
२१ जानेवारीपासून अमेरिकेची दारे बंद! ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया रोखली; भारतावर काय होणार परिणाम?
14
मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले...
15
PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले
16
निवृत्तीची चिंता संपली! पोस्टाची 'ही' स्कीम करेल मालामाल; दरमहा होईल ₹२०,००० ची कमाई, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल
18
कर्मचाऱ्यांना मिळणार ₹२ कोटींपर्यंतच्या इन्शुरन्स, स्वस्त लोनसह हे फायदे; लाँच झाली नवी सुविधा, जाणून घ्या
19
काही हरवलंय? काळजी सोडा! 'हा' एक मंत्र तुमची वस्तू शोधून देईल; अनेकांनी घेतलाय अनुभव 
20
731666404000 रुपये 'साफ'...! मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलरच्या क्लब मधून बाहेर; आता Q3 वर नजर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा आत्ताच कसा भकास दिसू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:08 IST

नाशिक : राज्यात भाजप सरकार असताना मराठवाड्यातील प्रश्न दिसले नाही, ते प्रश्न आताच कसे उपस्थित झाले, असा सवाल करीत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या काम करण्याच्या कार्यपद्धतीत फरक असल्याचेदेखील ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचाही त्यांनी समाचार घेतला.

ठळक मुद्देअब्दुल सत्तार : पंकजा मुंडे यांच्या विधानाचा घेतला समाचार

नाशिक : राज्यात भाजप सरकार असताना मराठवाड्यातील प्रश्न दिसले नाही, ते प्रश्न आताच कसे उपस्थित झाले, असा सवाल करीत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या काम करण्याच्या कार्यपद्धतीत फरक असल्याचेदेखील ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचाही त्यांनी समाचार घेतला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये गुरुवारी (दि.३०) सुरू असलेल्या विभागीय आढावा बैठकीसाठी आलेल्या सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. पंकजा मुंडे यांनी नुकत्याच केलेल्या मराठवाड्याच्या उपोषणाविषयी बोलताना सत्तार यांनी पंकजा मुंडे यांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सत्तेत असताना त्या काम करू शकल्या नाही, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि तेदेखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. सत्ता गेल्यानंतर एकच महिन्यात त्यांना मराठवाडा हा भकास का दिसू लागला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यापूर्वी मराठवाडा सुजलाम्-सुफलाम् होता का असा प्रश्न उपस्थित करून मुंडे यांचे आंदोलन ही केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप सत्तार यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती मात्र पंकजा मुंडे यांच्यामध्ये ते गुण दिसत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. अबू आझमी यांच्या मुलाने केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना सत्तार म्हणाले, अबू आझमी यांचा मुलगा जर आमच्या सोबत येऊन मशीद बांधण्याची गोष्ट करत असेल तर निश्चितपणे त्यांनी आमच्या सोबत यावे, आम्ही त्यांचे स्वागत करतो.जितेंद्र आव्हाड यांनी आणीबाणीसंदर्भात स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविषयी सतार यांनी कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्याविषयी बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे, असे सांगून सत्तार यांनी त्यांचा समाचार घेतला. आव्हाड यांना काय सल्ला देणार या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सत्तार यांनी आव्हाड यांनी शिर्डीला जावे तसेच श्रद्धेबरोबरच सबुरीचा सल्ला दिला.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारNashikनाशिक