शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

वनसंरक्षण ‘रामभरोसे’ संवर्धन होणार कसे?

By admin | Updated: July 23, 2014 00:27 IST

वनसंवर्धन दिन : उदासीनतेमुळे जंगलतोड सुरूच

नाशिक ; वाढत्या जंगलतोडीला आळा बसविण्यासाठी शासनानेच पुढाकार घेत आदिवासी बांधवांसाठी शासकीय योजनेतून स्वयंपाकाच्या गॅसची योजना आखली खरी, मात्र शासनाच्याच उदासीनतेमुळे ती बारगळली असून, गेल्या वर्षभरात योजनेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील लाभार्थींना अनुदान न मिळाल्याने त्यांच्या चुलीसाठी आजही जंगलातील वृक्षांचीच राख होते आहे. त्यामुळे वनसंरक्षणाचेच उपाय त्रोटक ठरत असल्याने संवर्धन तरी कसे होणार, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.पावसाळ्यात लागवड केलेल्या रोपांची निगा राखण्याची जबाबदारी वनविभागाची असली तरी, त्याचे कोणतेही निकष ठरलेले नाहीत. तरीही जितकी रोपे लावली जातात त्यापैकी जिवंत रोपांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमीच असते, मात्र हेच प्रमाण शासकीय पातळीवर ८० टक्के सांगितले जाते हे विशेष.गेल्या कित्येक वर्षांपासूनची जंगलतोडीची समस्या नाशिक वनविभागासमोर कायम असून, ती रोखण्यासाठी आत्तापर्यंत अपयशच आले आहे. त्यासाठी शासनाने जंगलात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांमध्ये जगजागृतीचेही उपक्रम राबविले, तरीही जंगलतोड सुरूच राहिली. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शासनाने आदिवासींसाठी २५ टक्के सबसिडीवर स्वयंपाकाच्या गॅसची योजना आखली. आदिवासी व वनविभाग यांच्या संयुक्त सहयोगातून सदरचा उपक्रम राबविला गेला. मात्र, जिल्ह्याच्या पश्चिम वनविभागातील आदिवासी तालुक्यातील आदिवासी लाभार्थींवर योजनेत सहभाग होऊनही शासनाच्या उदासीनतेमुळे वंचित राहण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांना पुन्हा स्वयंपाकासाठीच्या जळणासाठी जंगलतोडीकडेच वळावे लागल्याने शासनच वनसंवर्धनाबाबत गंभीर नसल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.