शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कांदाभाव वाढीने कोडमडले गृहिणींचे बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 22:57 IST

देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी भागातील गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले, अशा आशयाच्या विविध माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या वार्तांमुळे ग्रामीण भागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा संताप; सोशल मीडियावर उधाण

देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी भागातील गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले, अशा आशयाच्या विविध माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या वार्तांमुळे ग्रामीण भागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हॉटेलिंग, मल्टिप्लेक्स, चैनीच्या वस्तू, पेट्रोल, डिझेल आदींच्या भाववाढीवर चकार शब्द न बोलणाºया शहरी नागरिकांचे नेमके कांद्याचे भाव वाढल्यावरच आर्थिक बजेट कसे कोलमडते, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. सोशल मीडियावर याबाबत विविध प्रतिक्रि या दिल्या जात असून, शेतकºयांच्या भावना समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गतवर्षी दुष्काळामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई होती. पावसाला उशीर झाल्यामुळे खरीप पिकांच्या लागवडीला उशीर झाला.यामुळे रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवडीलादेखील उशीर होऊन कांदा पिकाला अंतिम टप्प्यात पाणी देताना पाणीटंचाई निर्माण होऊन पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला कांदा अनेक शेतकºयांना सोडून द्यावा लागला व शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. मजूर टंचाईमुळे शेतातून कांदा वेळेवर काढला गेला नाही.मात्र, जेव्हा कांद्याला थोडाफार भाव मिळतो तेव्हा शहरातील गृहिणींचे बजेट कांद्यानेच का कोलमडते, असा सवाल शेतकºयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत शेतकºयांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनदेखील केले आहे.गतवर्षी कांदा लागवडीसाठी व काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने परवडत नसतानादेखील नाइलाजाने इतर तालुक्यांतून मजूर आणावे लागल्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. मजुरीचे पैसे देण्यासाठी कांद्याचे दर कोसळलेले असताना तोटा खाऊन अनेक शेतकºयांना कांदे विकावे लागले होते.

टॅग्स :Marketबाजारonionकांदा