शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

महाराष्ट्रातील घराघरांत व्हावा माय मराठीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:10 IST

‘मराठी असे आमुची माय बोली’, किंवा ‘माझ्या मराठीचे बोलू, अमृताचेही पैजा जिंकी’ केवळ असे म्हणून मराठी भाषेचा विकास होणार नाही़ तर त्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करावे लागतील़ सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत परंतु त्याच बरोबर वैयक्तिक पातळीवर महाराष्ट्रातील घराघरातून मायबोलीसाठी प्रयत्न करावे लागतील असे मत साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले़

नाशिक : ‘मराठी असे आमुची माय बोली’, किंवा ‘माझ्या मराठीचे बोलू, अमृताचेही पैजा जिंकी’ केवळ असे म्हणून मराठी भाषेचा विकास होणार नाही़ तर त्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करावे लागतील़ सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत परंतु त्याच बरोबर वैयक्तिक पातळीवर महाराष्ट्रातील घराघरातून मायबोलीसाठी प्रयत्न करावे लागतील असे मत साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले़मराठी भाषा वाचवा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत त्यासाठी संवाद मराठी व्हायला हवा़ सरकारने देखील शाळाशाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करायला हवा़ इंग्रजी भाषेच्या वाढत्या वापरामुळे मराठीत अनेक शब्द लोप पावत चालले आहेत़ नव्या पिढीला मराठीतील अनेक शब्द माहित नाहीत़ कारण त्यांच्या जीभेवर इंग्रजी शब्दांनी ठाण मांडले आहे़ भावना व्यक्त करताना आपण इंग्रजीचा आधार शोधतो़ आपल्या जन्मापासून मराठीचे उच्चार कानावर पडत असताना आपल्याला त्या मातृभाषेचा संकोच वाटावा ही खरी शोकांतिका आहे़ अशी खंतही कवी, लेखकांनी व्यक्त केली़मराठी शाळा, महाविद्यालयांकडचा मराठी माणसांचा ओढा कमी झाला आहे़ परिणामी गेल्या दशकातील नवी पिढी आपली बोलीभाषा बाजूला ठेऊन घरातही इंग्रजीचा वापर करू लागली आहे़ त्यासाठी घरातही हट्टाने मराठी बोललं गेलं पाहीज.- दत्ता पाटील, नाट्य लेखकइंग्रजी भाषेने आपल्या जिभेवर ठाण मांडले आहे़ त्यामुळे आपल्या दैनंदिन व्यवहारात बोलताना आपण इंग्रजी भाषेचा वापर करतो़ एकमेकांना संदेश पाठविताना देखील थँक्यू, सॉरी याचा वापर करतो़ त्याऐवजी धन्यवाद, क्षमा असावी, माफ करा असे म्हणता येऊ शकते़ आपल्या घरात देखील मोठ्या माणसांनी मराठीचा वापर केला तर लहान मुले देखील मग इंग्रजी ऐवजी मराठीतच बोलतील़- संजय चौधरी, ज्येष्ठ कवीनव्या पिढीमध्ये मराठीचा वापर व्हावा म्हणून मी आपल्या घरापासून सुरुवात केली़ इंग्रजी शिक्षणाची सोय असताना माझ्या मुलांना मराठी शाळेत पाठविले़ आम्ही मुलांशी घरात मराठीतच संवाद साधतो़ अगदी बारीकसारीक गोष्टीची समज मुलांना मराठीतच यायला हवी़ मुलांनी मराठी पुस्तके वाचावीत म्हणून वेगवेगळ्या मराठी पुस्तकांची नावे आपण त्यांना सांगायला हवीत म्हणजे कुतुहल वाढेल़ आपल्या घरावर, दुकानांवर तसेच वाहनांवर देखील मराठी भाषेतच नावे टाकायला हवीत़- प्रकाश होळकर, साहित्यिक

टॅग्स :marathiमराठीNashikनाशिक