शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील घराघरांत व्हावा माय मराठीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:10 IST

‘मराठी असे आमुची माय बोली’, किंवा ‘माझ्या मराठीचे बोलू, अमृताचेही पैजा जिंकी’ केवळ असे म्हणून मराठी भाषेचा विकास होणार नाही़ तर त्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करावे लागतील़ सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत परंतु त्याच बरोबर वैयक्तिक पातळीवर महाराष्ट्रातील घराघरातून मायबोलीसाठी प्रयत्न करावे लागतील असे मत साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले़

नाशिक : ‘मराठी असे आमुची माय बोली’, किंवा ‘माझ्या मराठीचे बोलू, अमृताचेही पैजा जिंकी’ केवळ असे म्हणून मराठी भाषेचा विकास होणार नाही़ तर त्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करावे लागतील़ सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत परंतु त्याच बरोबर वैयक्तिक पातळीवर महाराष्ट्रातील घराघरातून मायबोलीसाठी प्रयत्न करावे लागतील असे मत साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले़मराठी भाषा वाचवा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत त्यासाठी संवाद मराठी व्हायला हवा़ सरकारने देखील शाळाशाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करायला हवा़ इंग्रजी भाषेच्या वाढत्या वापरामुळे मराठीत अनेक शब्द लोप पावत चालले आहेत़ नव्या पिढीला मराठीतील अनेक शब्द माहित नाहीत़ कारण त्यांच्या जीभेवर इंग्रजी शब्दांनी ठाण मांडले आहे़ भावना व्यक्त करताना आपण इंग्रजीचा आधार शोधतो़ आपल्या जन्मापासून मराठीचे उच्चार कानावर पडत असताना आपल्याला त्या मातृभाषेचा संकोच वाटावा ही खरी शोकांतिका आहे़ अशी खंतही कवी, लेखकांनी व्यक्त केली़मराठी शाळा, महाविद्यालयांकडचा मराठी माणसांचा ओढा कमी झाला आहे़ परिणामी गेल्या दशकातील नवी पिढी आपली बोलीभाषा बाजूला ठेऊन घरातही इंग्रजीचा वापर करू लागली आहे़ त्यासाठी घरातही हट्टाने मराठी बोललं गेलं पाहीज.- दत्ता पाटील, नाट्य लेखकइंग्रजी भाषेने आपल्या जिभेवर ठाण मांडले आहे़ त्यामुळे आपल्या दैनंदिन व्यवहारात बोलताना आपण इंग्रजी भाषेचा वापर करतो़ एकमेकांना संदेश पाठविताना देखील थँक्यू, सॉरी याचा वापर करतो़ त्याऐवजी धन्यवाद, क्षमा असावी, माफ करा असे म्हणता येऊ शकते़ आपल्या घरात देखील मोठ्या माणसांनी मराठीचा वापर केला तर लहान मुले देखील मग इंग्रजी ऐवजी मराठीतच बोलतील़- संजय चौधरी, ज्येष्ठ कवीनव्या पिढीमध्ये मराठीचा वापर व्हावा म्हणून मी आपल्या घरापासून सुरुवात केली़ इंग्रजी शिक्षणाची सोय असताना माझ्या मुलांना मराठी शाळेत पाठविले़ आम्ही मुलांशी घरात मराठीतच संवाद साधतो़ अगदी बारीकसारीक गोष्टीची समज मुलांना मराठीतच यायला हवी़ मुलांनी मराठी पुस्तके वाचावीत म्हणून वेगवेगळ्या मराठी पुस्तकांची नावे आपण त्यांना सांगायला हवीत म्हणजे कुतुहल वाढेल़ आपल्या घरावर, दुकानांवर तसेच वाहनांवर देखील मराठी भाषेतच नावे टाकायला हवीत़- प्रकाश होळकर, साहित्यिक

टॅग्स :marathiमराठीNashikनाशिक