शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

रिपाइंच्या अस्तित्वाला धोक्याची घंटा

By admin | Updated: October 21, 2014 02:00 IST

रिपाइंच्या अस्तित्वाला धोक्याची घंटा

 

नाशिक : भाजपा सोबत जाण्याचा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा निर्णय रिपब्लिकन जनतेला फारसा रुचलेला नसल्याचे आणि भाजपानेही रिपाइंला प्रचारापासून दूरच ठेवणे पसंत केल्यामुळे आचार, विचार आणि संस्कारात भाजपा व रिपाइंत मोठी दरी असल्याचे लपून राहिलेले नाही. या निवडणुकीत ते प्रकर्षाने दिसूनही आले. त्यामुळे महायुतीत रिपाइं कार्यकर्त्यांची घुसमट होणे ही रिपाइंला धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. आघाडी व युतीच्या फाटाफुटीनंतर सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना, रिपाइंमध्ये मात्र निवडणूक लढण्याची ऊर्जा दिसून आली नाही. एवढेच नाही, तर भाजपा या मित्रपक्षानेही रिपाइंला बाजूलाच ठेवल्यामुळे ‘ढाण्या वाघ’ अशी गर्जना करणाऱ्या रिपाइंची अवस्था केविलवाण्या मांजरीसारखी आहे, हे कटूसत्य रिपाइंला स्वीकारावेच लागणार आहे. भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिपाइंने राज्यातील ज्या आठ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यामध्ये देवळाली मतदारसंघाच्या जागेचाही समावेश होता. याच जागेसाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनीदेखील पक्षाचा उमेदवार उभा करून रिपाइंचे अस्तित्व नाकारले होते. भाजपाचा निर्णय योग्य होता हे मतमोजणीनंतर समोर आले आहेच. रिपाइंने खेड्यापाड्यात जाळे विणले असल्याचे आणि रामदास आठवले यांना मानणारा वर्ग असल्याचे बोलले जात असले, तरी रिपाइंच्या प्रकाश लोंढे यांना एकेका मतासाठी संघर्ष करावा लागला. ठाम राजकीय भूमिका नसल्याने निवडणुकीच्या धामधुमीतही कार्यकर्त्यांना मरगळ आल्याने रिपाइंची ही अस्वस्था त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. यापासून संघटनेने बोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.