शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रिपाइंच्या अस्तित्वाला धोक्याची घंटा

By admin | Updated: October 21, 2014 02:00 IST

रिपाइंच्या अस्तित्वाला धोक्याची घंटा

 

नाशिक : भाजपा सोबत जाण्याचा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा निर्णय रिपब्लिकन जनतेला फारसा रुचलेला नसल्याचे आणि भाजपानेही रिपाइंला प्रचारापासून दूरच ठेवणे पसंत केल्यामुळे आचार, विचार आणि संस्कारात भाजपा व रिपाइंत मोठी दरी असल्याचे लपून राहिलेले नाही. या निवडणुकीत ते प्रकर्षाने दिसूनही आले. त्यामुळे महायुतीत रिपाइं कार्यकर्त्यांची घुसमट होणे ही रिपाइंला धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. आघाडी व युतीच्या फाटाफुटीनंतर सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना, रिपाइंमध्ये मात्र निवडणूक लढण्याची ऊर्जा दिसून आली नाही. एवढेच नाही, तर भाजपा या मित्रपक्षानेही रिपाइंला बाजूलाच ठेवल्यामुळे ‘ढाण्या वाघ’ अशी गर्जना करणाऱ्या रिपाइंची अवस्था केविलवाण्या मांजरीसारखी आहे, हे कटूसत्य रिपाइंला स्वीकारावेच लागणार आहे. भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिपाइंने राज्यातील ज्या आठ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यामध्ये देवळाली मतदारसंघाच्या जागेचाही समावेश होता. याच जागेसाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनीदेखील पक्षाचा उमेदवार उभा करून रिपाइंचे अस्तित्व नाकारले होते. भाजपाचा निर्णय योग्य होता हे मतमोजणीनंतर समोर आले आहेच. रिपाइंने खेड्यापाड्यात जाळे विणले असल्याचे आणि रामदास आठवले यांना मानणारा वर्ग असल्याचे बोलले जात असले, तरी रिपाइंच्या प्रकाश लोंढे यांना एकेका मतासाठी संघर्ष करावा लागला. ठाम राजकीय भूमिका नसल्याने निवडणुकीच्या धामधुमीतही कार्यकर्त्यांना मरगळ आल्याने रिपाइंची ही अस्वस्था त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. यापासून संघटनेने बोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.