शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाशिकच्या पाच बिबट्यांना बोरिवलीत ‘पाहुणचार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 01:30 IST

देवळाली कॅम्प येथे गेल्या बुधवारी (दि.२९) पिंजऱ्यात जेरबंद झालेला प्रौढ नर बिबट्याची रवानगी बोरिवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात वनविभागाकडून करण्यात आली. नाशिक परिक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांपैकी चार बिबटे आणि सिन्नर परिक्षेत्रातील चिंचोलीत जेरबंद झालेला एक असे एकूण पाच बिबटे जुलै महिन्यात गांधी उद्यानात रवाना करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमादींची होणार सुटका : देवळाली कॅम्पचा बिबट्याही रवाना

नाशिक : देवळाली कॅम्प येथे गेल्या बुधवारी (दि.२९) पिंजऱ्यात जेरबंद झालेला प्रौढ नर बिबट्याची रवानगी बोरिवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात वनविभागाकडून करण्यात आली. नाशिक परिक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांपैकी चार बिबटे आणि सिन्नर परिक्षेत्रातील चिंचोलीत जेरबंद झालेला एक असे एकूण पाच बिबटे जुलै महिन्यात गांधी उद्यानात रवाना करण्यात आले आहेत.दारणाकाठालगतच्या नाशिक, सिन्नर परिक्षेत्रांतर्गतच्या गावांमध्ये मागील महिनाभरापासून बिबटे जेरबंद करण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. अद्याप दोन्ही रेंजमधील गावांमधून एकूण नऊ बिबटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. दारणा नदीच्या दोन्ही बाजूंच्या गावांच्या बांधांवर पिंजऱ्यांची तटबंदी करण्यात आली आहे. यामुळे या भागातील बिबटे जेरबंद होऊ लागले असून, दारणाकाठालगतच्या पंचक्र ोशीत पसरलेली बिबट्यांची दहशत कमी होण्यास मदत होत आहे.दोनवाडे, बाभळेश्वर या गावांमध्ये झालेल्या मानवी हल्ल्यातील मृतांच्या जखमांमधून संकलित केलेल्या बिबट्याच्या लाळेचे नमुने हैदराबादच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर या प्रयोगशाळेकडून वनविभागाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालात दारणा काठा लगत मानवी हल्ले हे ‘नर’ बिबट्याने केले असल्याचा निर्वाळा देण्यात आला. यामुळे वनविभागापुढील पेच काही अंशी सुटला असला तरी नेमका कोणता नर आणि तो नरक्षभक झाला आहे का? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. यामुळे बिबट्यांची धरपकड दारणाकाठावर अशीच काही दिवस सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत नाशिक वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून देण्यात आलेआहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे़...तोपर्यंत बिबटे भोगणार ‘शिक्षा’नाशिकमध्ये जेरबंद झालेले नर व प्रौढ मादी बिबटे थेट बोरिवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात पाठविले जात असले तरी तेथेही त्यांना पिंजºयातून मुक्तता अद्यापपावेतो मिळालेली नाही. जोपर्यंत नरभक्षक बिबट्याचा कोणता हे डीएनए चाचणीवरून स्पष्ट होत नाही, तोपर्यंत तरी तेथील बिबट्यांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता अशक्य असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.दारणाखोºयात झालेले मानवी हल्ले हे नराचे असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे गांधी उद्यानात कैदेत असलेल्या दोन्ही मादी बिबट्यासह पळसेत जेरबंद झालेला कमी वयाचा नर बछड्याचा सुटकेचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. त्यादृष्टीने नाशिक पश्चिम वनविभागाकडून पत्रव्यवहारही केला जाण्याची चिन्हे आहेत. परवानगीनंतर या बिबट्यांची सुटका होऊ शकेल़

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या