शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

घोटीत संतप्त जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:45 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जी-पणामुळे नवजात शिशुसह अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त जमावाने सोमवारी रुग्णालयाची तोडफोड केली. दरम्यान या हॉस्पिटलचा परवाना दुसºयाच डॉक्टरच्या नावे असून, घोटी येथील ७ डॉक्टर हे रुग्णालय चालवितात, अशी गंभीर बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देडॉक्टरांच्या हलगर्जी-पणामुळे नवजात शिशुसह अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू हॉस्पिटलचा परवाना दुसºयाच डॉक्टरच्या नावे

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जी-पणामुळे नवजात शिशुसह अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त जमावाने सोमवारी रुग्णालयाची तोडफोड केली. दरम्यान या हॉस्पिटलचा परवाना दुसºयाच डॉक्टरच्या नावे असून, घोटी येथील ७ डॉक्टर हे रुग्णालय चालवितात, अशी गंभीर बाब समोर आली आहे.घोटी शहरातील महाराणा प्रताप चौकातील अश्विनी ज्ञानेश्वर भोर यांना प्रसूतीसाठी रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गुरु कृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत नाशिकहून डॉक्टर येईपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. रात्री सुस्थित आलेल्या महिलेला प्रसूती कळांचा जोर वाढल्याने डॉ. कडून सिजरीन करण्यात आले. त्यात निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला. बाळ दगावल्याने नातेवाइकांनी आक्र ोश केला. दरम्यान याच वेळेत फांगुळगाव येथील कविता भगवान दुभाषे या अकरा वर्षीयविद्यार्थिनीस पायास सूज आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची परिस्थितीदेखील चांगली असतांना पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयात ठेवण्यात आले होते, दरम्यान सकाळी आठ वाजेदरम्यान उपचारासाठी दिलेल्या इंजेक्शनमुळे तीला भुवळ येण्यास सूरवात झाली. याबाबत डॉक्टरांना सांगितले असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने रु ग्णालयातच मुलीने प्राण सोडले. दोन्ही घटना एकाच वेळेस घडल्याने शहरभर त्याची चर्चा पसरली. अनेक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाने रूग्णालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती काबूत आण्याचा प्रयत्न केला.घोटी शहरात ही बातमी पोहचताच प्रचंड जनसमुदायासह मृतांचे नातेवाईक गोळा झाले होते. त्यांनी रुग्णांना वाºयावर सोडून पळून गेलेल्या डॉक्टरांवर खुनाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. अखेर पोलीसांनी ५ डॉक्टरांना ताब्यात घेतल्यानंतर जमाव शांत झाला. याप्रसंगी उपस्थित जन समुदायासह मृतांच्या नातेवाईकांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई व्हावी व या बोगस डॉक्टरांना अभय देणाºया तालुका वैद्यकिय अधिकाºयास निलंबित कारवे अशी मागणी केली. या आशयाचे निवेदन उपविभागीय ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना देण्यात आले. संशयीतांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन झेंडे यांनी दिले.घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल झेंडे घटनास्थळी तळ ठोकून होते. साहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी तातडीने शहरातील लोकप्रतिनिधींना बोलावत जमावास शांत राहण्याचे आवाहन केले. संशयीत डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदा माळी, विलास घिसाडी पुढील तपास करत आहेत.