शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

घोटीत संतप्त जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:45 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जी-पणामुळे नवजात शिशुसह अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त जमावाने सोमवारी रुग्णालयाची तोडफोड केली. दरम्यान या हॉस्पिटलचा परवाना दुसºयाच डॉक्टरच्या नावे असून, घोटी येथील ७ डॉक्टर हे रुग्णालय चालवितात, अशी गंभीर बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देडॉक्टरांच्या हलगर्जी-पणामुळे नवजात शिशुसह अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू हॉस्पिटलचा परवाना दुसºयाच डॉक्टरच्या नावे

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जी-पणामुळे नवजात शिशुसह अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त जमावाने सोमवारी रुग्णालयाची तोडफोड केली. दरम्यान या हॉस्पिटलचा परवाना दुसºयाच डॉक्टरच्या नावे असून, घोटी येथील ७ डॉक्टर हे रुग्णालय चालवितात, अशी गंभीर बाब समोर आली आहे.घोटी शहरातील महाराणा प्रताप चौकातील अश्विनी ज्ञानेश्वर भोर यांना प्रसूतीसाठी रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गुरु कृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत नाशिकहून डॉक्टर येईपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. रात्री सुस्थित आलेल्या महिलेला प्रसूती कळांचा जोर वाढल्याने डॉ. कडून सिजरीन करण्यात आले. त्यात निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला. बाळ दगावल्याने नातेवाइकांनी आक्र ोश केला. दरम्यान याच वेळेत फांगुळगाव येथील कविता भगवान दुभाषे या अकरा वर्षीयविद्यार्थिनीस पायास सूज आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची परिस्थितीदेखील चांगली असतांना पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयात ठेवण्यात आले होते, दरम्यान सकाळी आठ वाजेदरम्यान उपचारासाठी दिलेल्या इंजेक्शनमुळे तीला भुवळ येण्यास सूरवात झाली. याबाबत डॉक्टरांना सांगितले असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने रु ग्णालयातच मुलीने प्राण सोडले. दोन्ही घटना एकाच वेळेस घडल्याने शहरभर त्याची चर्चा पसरली. अनेक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाने रूग्णालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती काबूत आण्याचा प्रयत्न केला.घोटी शहरात ही बातमी पोहचताच प्रचंड जनसमुदायासह मृतांचे नातेवाईक गोळा झाले होते. त्यांनी रुग्णांना वाºयावर सोडून पळून गेलेल्या डॉक्टरांवर खुनाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. अखेर पोलीसांनी ५ डॉक्टरांना ताब्यात घेतल्यानंतर जमाव शांत झाला. याप्रसंगी उपस्थित जन समुदायासह मृतांच्या नातेवाईकांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई व्हावी व या बोगस डॉक्टरांना अभय देणाºया तालुका वैद्यकिय अधिकाºयास निलंबित कारवे अशी मागणी केली. या आशयाचे निवेदन उपविभागीय ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना देण्यात आले. संशयीतांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन झेंडे यांनी दिले.घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल झेंडे घटनास्थळी तळ ठोकून होते. साहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी तातडीने शहरातील लोकप्रतिनिधींना बोलावत जमावास शांत राहण्याचे आवाहन केले. संशयीत डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदा माळी, विलास घिसाडी पुढील तपास करत आहेत.