शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

शासनाचे वरातीमागून घोडे ; रब्बी पेरणी अखेरच्या टप्प्यात असताना दिली खरीप नुकसानींच्या पंचनाम्यांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 20:58 IST

नाशिक : दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात जिल्हाभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागांचे पीक पंचनामे करून तत्काळ मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. परंतु, ऑक्टोबर उलटल्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसान झालेले पीक शेतातून काढून रब्बी पेरणीची तयारी केली असताना, शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर ...

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसानदिवाळीपूर्वी मुसळधार पावसाने झोडपलेनुकसानग्रस्त शेतांमध्ये रब्बीच्या पेरण्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांमध्ये नुकसान भरपाईविषयी संभ्रम

नाशिक : दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात जिल्हाभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागांचे पीक पंचनामे करून तत्काळ मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. परंतु, ऑक्टोबर उलटल्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसान झालेले पीक शेतातून काढून रब्बी पेरणीची तयारी केली असताना, शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देत वरातीमागून घोडे मिरविण्याचा प्रकार केला आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाचा सुमारे 50 हजार शेतकऱ्यांना फटका बसला असून, जवळपास 25 हजार हेक्टर क्षेत्रवरील पिके पावसामुळे बाधित झाली आहेत. यंदा चांगल्या पावसामुळे चांगले उत्पादन होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले, परंतु परतीच्या पावसाने शेतक:यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. जिल्ह्यातील 662 गावांतील 48 हजार 984 शेतक:यांचे अवकाळीने नुकसान झाले. जिरायत क्षेत्रतील भात, नागली, वरई, बाजरी, भुईमूग, उडीद, खुरासणी, सोयाबीन, मका या पिकांचे 12 हजार 888.55 हेक्टर, तर बागायती क्षेत्रतील 2639.64 हेक्टर क्षेत्रतील कांदा, ऊस व भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका द्राक्षपिकाला बसला. ऐन छाटणीच्या व झाडाने फूल धरण्याच्या काळातच बेमोसमी पाऊस झाल्याने झाडांची फुले गळून पडली, तर हाती आलेला कांदा भुईसपाट झाला. 10 हजार 274 हेक्टरवरील द्राक्षांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने प्राथमिक पातळीवर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मात्र शासनाकडून कोणतेही निर्देश नसल्याने पीक पंचनामे करण्यात आले नव्हते. आता ऑक्टोबर महिना उलटल्यानंतर शासनाला जाग आली असून, शेतकऱ्यांना शेतातील नुकसान झालेले रब्बीचे पीक काढून तेथे रब्बीची पेरणी अथवा पेरणीची तयारी सुरू केली आहे. परंतु शासनाच्या आदेशानंतर पंचनाम्यासाठी यंत्रणा कामाला लागणार असल्याने अधिकाऱ्यांना काय नुकसान दाखवावे, असा प्रश्न शेतऱ्यांसमोर उभा राहणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या तालुक्यांतील नुकसानीचे पंचनामे करण्यात येतात. मात्र, यावर्षी परतीच्या पावसाने पिके काढणीला आली असताना, अल्पावधीत मोठे नुकसान झाल्याने सरसकट पंचनामे करण्याची मागणी होत आहे. त्यातही आता 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांनाच नुकसानभरपाई मिळणार असल्याने किती शेतकरी यास पात्र ठरणार याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस