शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नासाका सुरु होण्याची आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:15 IST

राज्यातील बंद असलेल्या कारखान्यांचे सर्वेक्षण करून चालू होण्याच्या स्थितीत असलेल्या कारखान्यांना मदतीचा हात देऊन ते आगामी हंगामात सुरू करण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

नाशिकरोड : राज्यातील बंद असलेल्या कारखान्यांचे सर्वेक्षण करून चालू होण्याच्या स्थितीत असलेल्या कारखान्यांना मदतीचा हात देऊन ते आगामी हंगामात सुरू करण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. साखर आयुक्तालयाच्या आदेशान्वये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाने नाशिक सहकारी साखर कारखान्यास भेट देत परिस्थितीची पाहणी केली. नासाकाची स्थिती चालू होण्यासाठी अनुकूल असल्याचे प्रथमदर्शनी मत व्यक्त केल्याने आगामी गळीत हंगामात नासाका सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आर्थिक अडचणीमुळे नासाकाचा गळीत हंगाम बंद आहे. या काळात कारखाना कार्यक्षेत्रातून दोन लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस प्रतिवर्षी बाहेरील कारखान्यांना गेला आहे. चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नासाका कारखान्यावर अवसायक नेमून वाढणाºया व्याजाला ब्रेक लावला आहे. सद्यस्थितीत नासाकावर जिल्हा बँकेचे ८४ कोटी कर्ज व व्याज थकीत आहे. या पाहणीचा अहवाल साखर आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविला जाईल. त्यानंतर त्यावर निर्णय होणार असल्याचे रेपाळे व देसाई यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधाकर गोडसे, केमिस्ट हरी दळवी, अभियंता रणजित सहाणे, शेतकी विभागाचे विष्णुपंत गायखे, कामगार युनियनचे शिवराम गायधनी, नामदेव बोराडे, सुरेश दळवी, बी. बी. काकड, गेनू आडके, विठ्ठल घुले, खंडेराव आडके आदी उपस्थित होते.यावेळी माजी अध्यक्ष तानाजी गायधनी, अशोक खालकर यांनी रेपाळे व देसाई यांची भेट घेऊन कुठल्याही परिस्थितीत कारखाना सुरू व्हावा, अशी मागणी केली.राज्य शासनाने १७ फेब्रुवारी रोजी साखर आयुक्त संभाजीराव कडू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक बोलावून सुरु होऊ शकणाºया २८ पैकी पहिल्या टप्प्यातील दहा कारखान्यांची आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये नासाकाचा समावेश होता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. जुगलकिशोर रेपाळे, अभियंता सुहास देसाई यांनी बुधवारी कारखान्याची मशीनरी, गव्हाण, गुदाम, स्टोअर, मिल आदींची पाहणी करून कर्मचाºयांकडून तांत्रिक बाबींची माहिती घेतली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने