शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

रब्बीच्या आशा पल्लवित

By admin | Updated: September 26, 2016 00:30 IST

सुकाळ : भालूर, लोहशिंगवे, लक्ष्मीनगर बंधारे भरून वाहू लागले

मनमाड : भालूर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने भालूरसह लक्ष्मीनगर व लोहशिंगवे येथील बंधारे भरून वाहू लागले आहेत. या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा मात्र पल्लवित झाल्या आहे.परिसरात खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजरीची जागा मक्याने घेतली आहे. बऱ्यापैकी निघणारे उत्पादन व बाजारभावामुळे खरिपामध्ये मक्याचे पीक फायदेशीर ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव या वर्षीही शेतकऱ्यांना अनुभवयास मिळाला. पावसाळ्याच्या सुरुवातीस पावसाने हजेरी लावली असली तरी नंतर महिनाभर दडी मारली होती. श्रावण महिन्यातही समाधानकारक पावसाचे आगमन झाले नसल्याने निदान पोळ्याच्या दिवशी तरी पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या मनात घर करून होती; मात्र ती फोल ठरली. सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भालूर परिसरात अधूनमधून येणाऱ्या रिमझिम पावसावर खरिपाचे पीक बऱ्यापैकी आले. तुरळक स्वरूपाच्या पावसाने खरिपाला जीवदान मिळाले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी खरिपाचे पीक वाया जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे. या पावसामुळे भालूर, लोहशिंगवे व लक्ष्मीनगर या बंधाऱ्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रब्बी हंगामामध्ये परिसरात गहू, हरबरा, उन्हाळ व रांगडा कांदा ही पिके प्रामुख्याने घेण्यात येतात. परिसरात असलेल्या भालूर, लोहशिंगवे या गावांमधील बंधाऱ्याच्या पाटाच्या पाण्याच्या आवर्तनाची रब्बी हंगामास मदत होत असते. दमदार पावसाच्या हजेरीमुळे दुष्काळ संपुष्टात आला असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)भालूर येथे पिकांचे नुकसानभालूर परिसरात तुरळक स्वरूपाच्या पावसाने खरिपाला जीवदान मिळाले होते; मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दुष्काळ संपुष्टात आला असला तरी काही ठिकाणी खरिपाचे पीक वाया जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे. अनेक ठिकाणी सोंगून ठेवलेल्या बाजऱ्या व मका भिजून नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी कांद्याच्या शेतात पाणी तुंबल्याने पिके वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे भूगर्भातील पातळीत वाढ झाल्याने रब्बी हंगाम चांगला निघणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.