शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
5
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
6
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
7
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
8
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
9
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
11
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
12
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
13
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
14
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
15
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
16
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
17
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
18
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
19
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
20
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत

रब्बीच्या आशा पल्लवित

By admin | Updated: September 26, 2016 00:30 IST

सुकाळ : भालूर, लोहशिंगवे, लक्ष्मीनगर बंधारे भरून वाहू लागले

मनमाड : भालूर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने भालूरसह लक्ष्मीनगर व लोहशिंगवे येथील बंधारे भरून वाहू लागले आहेत. या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा मात्र पल्लवित झाल्या आहे.परिसरात खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजरीची जागा मक्याने घेतली आहे. बऱ्यापैकी निघणारे उत्पादन व बाजारभावामुळे खरिपामध्ये मक्याचे पीक फायदेशीर ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव या वर्षीही शेतकऱ्यांना अनुभवयास मिळाला. पावसाळ्याच्या सुरुवातीस पावसाने हजेरी लावली असली तरी नंतर महिनाभर दडी मारली होती. श्रावण महिन्यातही समाधानकारक पावसाचे आगमन झाले नसल्याने निदान पोळ्याच्या दिवशी तरी पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या मनात घर करून होती; मात्र ती फोल ठरली. सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भालूर परिसरात अधूनमधून येणाऱ्या रिमझिम पावसावर खरिपाचे पीक बऱ्यापैकी आले. तुरळक स्वरूपाच्या पावसाने खरिपाला जीवदान मिळाले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी खरिपाचे पीक वाया जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे. या पावसामुळे भालूर, लोहशिंगवे व लक्ष्मीनगर या बंधाऱ्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रब्बी हंगामामध्ये परिसरात गहू, हरबरा, उन्हाळ व रांगडा कांदा ही पिके प्रामुख्याने घेण्यात येतात. परिसरात असलेल्या भालूर, लोहशिंगवे या गावांमधील बंधाऱ्याच्या पाटाच्या पाण्याच्या आवर्तनाची रब्बी हंगामास मदत होत असते. दमदार पावसाच्या हजेरीमुळे दुष्काळ संपुष्टात आला असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)भालूर येथे पिकांचे नुकसानभालूर परिसरात तुरळक स्वरूपाच्या पावसाने खरिपाला जीवदान मिळाले होते; मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दुष्काळ संपुष्टात आला असला तरी काही ठिकाणी खरिपाचे पीक वाया जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे. अनेक ठिकाणी सोंगून ठेवलेल्या बाजऱ्या व मका भिजून नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी कांद्याच्या शेतात पाणी तुंबल्याने पिके वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे भूगर्भातील पातळीत वाढ झाल्याने रब्बी हंगाम चांगला निघणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.