शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीच्या आशा पल्लवित

By admin | Updated: September 26, 2016 00:30 IST

सुकाळ : भालूर, लोहशिंगवे, लक्ष्मीनगर बंधारे भरून वाहू लागले

मनमाड : भालूर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने भालूरसह लक्ष्मीनगर व लोहशिंगवे येथील बंधारे भरून वाहू लागले आहेत. या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा मात्र पल्लवित झाल्या आहे.परिसरात खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजरीची जागा मक्याने घेतली आहे. बऱ्यापैकी निघणारे उत्पादन व बाजारभावामुळे खरिपामध्ये मक्याचे पीक फायदेशीर ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव या वर्षीही शेतकऱ्यांना अनुभवयास मिळाला. पावसाळ्याच्या सुरुवातीस पावसाने हजेरी लावली असली तरी नंतर महिनाभर दडी मारली होती. श्रावण महिन्यातही समाधानकारक पावसाचे आगमन झाले नसल्याने निदान पोळ्याच्या दिवशी तरी पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या मनात घर करून होती; मात्र ती फोल ठरली. सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भालूर परिसरात अधूनमधून येणाऱ्या रिमझिम पावसावर खरिपाचे पीक बऱ्यापैकी आले. तुरळक स्वरूपाच्या पावसाने खरिपाला जीवदान मिळाले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी खरिपाचे पीक वाया जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे. या पावसामुळे भालूर, लोहशिंगवे व लक्ष्मीनगर या बंधाऱ्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रब्बी हंगामामध्ये परिसरात गहू, हरबरा, उन्हाळ व रांगडा कांदा ही पिके प्रामुख्याने घेण्यात येतात. परिसरात असलेल्या भालूर, लोहशिंगवे या गावांमधील बंधाऱ्याच्या पाटाच्या पाण्याच्या आवर्तनाची रब्बी हंगामास मदत होत असते. दमदार पावसाच्या हजेरीमुळे दुष्काळ संपुष्टात आला असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)भालूर येथे पिकांचे नुकसानभालूर परिसरात तुरळक स्वरूपाच्या पावसाने खरिपाला जीवदान मिळाले होते; मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दुष्काळ संपुष्टात आला असला तरी काही ठिकाणी खरिपाचे पीक वाया जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे. अनेक ठिकाणी सोंगून ठेवलेल्या बाजऱ्या व मका भिजून नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी कांद्याच्या शेतात पाणी तुंबल्याने पिके वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे भूगर्भातील पातळीत वाढ झाल्याने रब्बी हंगाम चांगला निघणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.