शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

बहुमान : महाराष्ट्रतील त्र्यंबकेश्वर या एकमेव तीर्थक्षेत्राला ‘प्रसाद’चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 21:25 IST

केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाकडून घोषित करण्यात आलेल्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत २०१६-१७ साली काही शहरांमधील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांचा समावेश नव्याने करण्यात आला. ही योजना केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाने २०१५मध्ये जाहीर केली.

ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरला स्थान मिळाल्याने हा बहुमान ठरला. प्रसाद योजनेअंतर्गत स्थान मिळणारे त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रतील एकमेव तीर्थक्षेत्र या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एकूण ३८ कोंटींचा निधी

नाशिक : धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण निधी केंद्र सरकारने उपलब्ध क रून दिला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर या नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी एकूण ३८ कोटींचा निधी केंद्र सरकार देणार आहे. प्रसाद योजनेअंतर्गत स्थान मिळणारे त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रतील एकमेव तीर्थक्षेत्र ठरले आहे.केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाकडून घोषित करण्यात आलेल्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत २०१६-१७ साली काही शहरांमधील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांचा समावेश नव्याने करण्यात आला. ही योजना केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाने २०१५मध्ये जाहीर केली. यावेळी महाराष्ट्रतील एकाही तीर्थक्षेत्राला यामध्ये स्थान मिळालेले नव्हते; मात्र २०१६-१७ साली नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरला स्थान मिळाल्याने हा बहुमान ठरला. यामध्ये विविध राज्यांमधील १२ नवे तीर्थक्षेत्र त्यावेळी निवडले गेले. प्रसाद योजनेअंतर्गत समाविष्ट झालेले राज्यातील हे एकमेव तीर्थक्षेत्र असून, या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एकूण ३८ कोंटींचा निधी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविक पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटक सुविधा केंद्र, माहिती केंद्र विकसित केले जाणार आहे. जेणेकरून देशभरातून येणा-या भाविक पर्यटकांना त्र्यंबकेश्वरचे धार्मिक-पौराणिक महत्त्व, परिसरातील धार्मिक पर्यटनस्थळे आदींविषयीची माहिती सहज उपलब्ध होण्यास मदत होईल, असे राज्य पर्यटन महामंडळाचे नाशिक प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

देशभरातील या तीर्थक्षेत्रांचा समावेशअयोध्या (उत्तरप्रदेश), बद्रीनाथ (उत्तराखंड), बेल्लूर (पश्चिम बंगाल), देवघर (झारखंड), गुरूवय्यूर (केरळ), हजरत बल व कटरा (जम्मू- काश्मिर), ओंकारेश्वर (मध्यप्रदेश), सोमनाथ (गुजरात), सिरिसैलाम व तिरुपती (आंध्रप्रदेश), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र ) या १२तीर्थक्षेत्रांचा नव्याने २०१६-१७ साली प्रसाद योजनेत समावेश करण्यात आला. तत्पुर्वी २०१५ साली देशभरातील विविध राज्यांमधील १२ तीर्थक्षेत्रांचाही समावेश या योजनेत झाला होता;मात्र त्यावेळीदेखील महाराष्ट्रतील कोणत्याही तीर्थक्षेत्राला स्थान मिळालेले नव्हते. या योजनेत सध्या २४ तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर हे त्यामधील एक तीर्थक्षेत्र आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरCentral Governmentकेंद्र सरकारtourismपर्यटनNashikनाशिक