शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

बहुमान : महाराष्ट्रतील त्र्यंबकेश्वर या एकमेव तीर्थक्षेत्राला ‘प्रसाद’चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 21:25 IST

केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाकडून घोषित करण्यात आलेल्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत २०१६-१७ साली काही शहरांमधील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांचा समावेश नव्याने करण्यात आला. ही योजना केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाने २०१५मध्ये जाहीर केली.

ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरला स्थान मिळाल्याने हा बहुमान ठरला. प्रसाद योजनेअंतर्गत स्थान मिळणारे त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रतील एकमेव तीर्थक्षेत्र या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एकूण ३८ कोंटींचा निधी

नाशिक : धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण निधी केंद्र सरकारने उपलब्ध क रून दिला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर या नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी एकूण ३८ कोटींचा निधी केंद्र सरकार देणार आहे. प्रसाद योजनेअंतर्गत स्थान मिळणारे त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रतील एकमेव तीर्थक्षेत्र ठरले आहे.केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाकडून घोषित करण्यात आलेल्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत २०१६-१७ साली काही शहरांमधील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांचा समावेश नव्याने करण्यात आला. ही योजना केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाने २०१५मध्ये जाहीर केली. यावेळी महाराष्ट्रतील एकाही तीर्थक्षेत्राला यामध्ये स्थान मिळालेले नव्हते; मात्र २०१६-१७ साली नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरला स्थान मिळाल्याने हा बहुमान ठरला. यामध्ये विविध राज्यांमधील १२ नवे तीर्थक्षेत्र त्यावेळी निवडले गेले. प्रसाद योजनेअंतर्गत समाविष्ट झालेले राज्यातील हे एकमेव तीर्थक्षेत्र असून, या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एकूण ३८ कोंटींचा निधी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविक पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटक सुविधा केंद्र, माहिती केंद्र विकसित केले जाणार आहे. जेणेकरून देशभरातून येणा-या भाविक पर्यटकांना त्र्यंबकेश्वरचे धार्मिक-पौराणिक महत्त्व, परिसरातील धार्मिक पर्यटनस्थळे आदींविषयीची माहिती सहज उपलब्ध होण्यास मदत होईल, असे राज्य पर्यटन महामंडळाचे नाशिक प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

देशभरातील या तीर्थक्षेत्रांचा समावेशअयोध्या (उत्तरप्रदेश), बद्रीनाथ (उत्तराखंड), बेल्लूर (पश्चिम बंगाल), देवघर (झारखंड), गुरूवय्यूर (केरळ), हजरत बल व कटरा (जम्मू- काश्मिर), ओंकारेश्वर (मध्यप्रदेश), सोमनाथ (गुजरात), सिरिसैलाम व तिरुपती (आंध्रप्रदेश), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र ) या १२तीर्थक्षेत्रांचा नव्याने २०१६-१७ साली प्रसाद योजनेत समावेश करण्यात आला. तत्पुर्वी २०१५ साली देशभरातील विविध राज्यांमधील १२ तीर्थक्षेत्रांचाही समावेश या योजनेत झाला होता;मात्र त्यावेळीदेखील महाराष्ट्रतील कोणत्याही तीर्थक्षेत्राला स्थान मिळालेले नव्हते. या योजनेत सध्या २४ तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर हे त्यामधील एक तीर्थक्षेत्र आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरCentral Governmentकेंद्र सरकारtourismपर्यटनNashikनाशिक