शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
3
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
4
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
5
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
6
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
7
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
9
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
10
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
12
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
13
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
14
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
15
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
16
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
17
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
18
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
19
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
20
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिक लोकांनी राजकारणात येण्याची गरज - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:20 IST

दिंडोरी : निवडणुका खर्चिक व राजकारण बिनभरवशाचे झाले असले तरी लोकशाहीमध्ये निवडून येऊन शासनाच्या माध्यमातून लोकांची सेवा जास्त चांगल्या प्रकारे करण्याचे मार्ग सापडतात. म्हणून जात, धर्म न पाहता काम बघून आपला प्रतिनिधी निवडून दिल्यास प्रामाणिक व सेवाभावी लोक राजकारणात येतील व त्यांनी लोकांची सेवा निरपेक्ष भावनेने केली तर लोक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे नक्कीच उभे राहतील.

ठळक मुद्देकर्मयोगी एकनाथभाऊ जाधव प्रतिष्ठानच्या ६४व्या प्रबोधन व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : निवडणुका खर्चिक व राजकारण बिनभरवशाचे झाले असले तरी लोकशाहीमध्ये निवडून येऊन शासनाच्या माध्यमातून लोकांची सेवा जास्त चांगल्या प्रकारे करण्याचे मार्ग सापडतात. म्हणून जात, धर्म न पाहता काम बघून आपला प्रतिनिधी निवडून दिल्यास प्रामाणिक व सेवाभावी लोक राजकारणात येतील व त्यांनी लोकांची सेवा निरपेक्ष भावनेने केली तर लोक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे नक्कीच उभे राहतील.राजकारणात तरु ण, प्रामाणिक व सेवाभावी लोकांनी येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले. मोहाडी (ता. दिंडोरी) येथील श्रीकृष्ण जन्मोत्सव, ग्रामदैवत मोहाड मल्ल व कान्होबा यात्रेनिमित्त आयोजित कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव प्रतिष्ठानच्या ६४व्या प्रबोधन व्याख्यानमालेत विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष निवृत्ती रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ ‘राजकारण आणि समाजव्यवस्था’ या विषयावर सहावे पुष्प गुंफताना कडू बोलत होते.यावेळी दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, डॉ. भाऊसाहेब मोरे, प्रवीण जाधव, सुरेश कळमकर, बाळासाहेब कदम, विलास पाटील, शिवाजी पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडके, उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, अजित आव्हाड, प्रतीक देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक व परिचय धनंजय वानले यांनी करून दिला. सूत्रसंचालन फाउण्डेशनचे अध्यक्ष तथा प्राचार्य विलास देशमुख यांनी केले. आभार संजय डिंगोरे यांनी मानले.