शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

कातरणीत विद्यार्थ्यांना दाखल्यांचे घरपोच वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:08 IST

पाटोदा : शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी विविध दाखल्यांची गरज भासते मात्र ऐनवेळी दाखले काढण्यासाठी विद्यार्थी तसेच पालकांची मोठी धावपळ होत असते .वेळेत दाखले मिळाले नाही तर शैक्षणिक नुकसानही होत असल्याने शाळेतच विद्यार्थ्यांंना दाखले उपलब्ध करून दिल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यासाठी येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्र म राबविण्यात आला असून कातरणी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना वय अधिवास,राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व जातींच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी तहसीलदार वारु ळे यांनी मार्गदर्शन केले. निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द ,चिकाटी व मेहनत या गोष्टी असाव्यात, स्पर्धा परीक्षांची तयारी करून चांगले अधिकारी व्हावे असे आवाहन करून विविध शासकीय योजनांची माहिती द्यावी, जे दाखले बाकी असतील त्या विद्यार्थी व पालकांनी या समाधान शिबिराच्या माध्यमातून बनवून घ्यावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले . यावेळी नायब तहसीलदार प्रकाश बुरंगुळे, सेतू संचालक चेतन मोकळ, महा- इ सेवा संचालक नामदेव पगार, ग्रामस्थ चांगदेव कदम,बाबुराव ठाकरे ,बाळासाहेब ठाकरे तसेच मुख्याध्यापक बाळासाहेब पानसरे,पोपट बारे, एस. एस. ठाकरे, बी. व्ही. आवारे, बी. बी. कदम, एस. एस. नरोटे, एस. आर. जगताप, व्ही. एन. येवले, श्रीमती संसारे, वैराळ, पाटील आदींसह ग्रामस्थ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पोपट बारे यांनी तर एस. एस. नरोटे यांनी आभार मानले.

टॅग्स :TahasildarतहसीलदारSchoolशाळा