शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कर्जमाफीच्या प्रस्तावाची होळी

By admin | Updated: June 19, 2017 00:21 IST

शासनाकडून फसवणूक : शेतकऱ्यांना दिलासा नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : फडणवीस सरकारच्या मंत्रिगटाचा तत्त्वत: निकषांच्या आधारावर सरसकट कर्जमाफीचा प्रस्ताव फसवा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा नसल्याने शेतकरी वर्गात मोठा रोष निर्माण होत आहे. जर सुकाणू समितीने शासनाच्या अटी मान्य केल्या तर सुकाणू समितीला शेतकरी कदापि माफ करणार नाही, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. सरसकट कर्जमाफी निर्णयाच्या निषेधचा भाग म्हणून निफाडच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या प्रस्तावाच्या प्रतिची ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रतीकात्मक होळी केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने सुकाणू समितीने तो मान्य करू नये त्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांत जागृती करून पुन्हा एकदा आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.कर्जमाफीचे निकष म्हणजे भाकरीपेक्षा भोकरच जड अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची खातेफोड झालेली नसते. त्याच्याकडे ट्रॅक्टर तर असतोच. याशिवाय बाजार समितीत शेतमाल नेण्यासाठी कर्ज काढून जीप किंवा चारचाकी वाहन खरेदी अपरिहार्य आहे. हल्ली शहरात तर सर्वसाधारण व्यक्तीकडे वाहन असते. दुचाकीपेक्षा जुनी चारचाकी स्वस्त अन् प्रत्येक कोपऱ्यावर एजंटांनी त्याची दुकाने थाटलेली असतात. शेतीवर पोट भरत नाही म्हणून कोणी पानपट्टी गोळ्या बिस्किटांचे दुकान, पानटपरी काढली तर त्यालाही नोंदणी करावी लागते. उत्पन्न मात्र शंभर, दिडशे रुपयांवर नसते. त्यालाही कर्ज हवे तर बँका इन्कमटॅक्स रिटर्नची प्रत मागते, म्हणून युवक रिटर्न भरतात. आता हे सगळेच त्यांच्या मुळावर आले आहे. सरकारने शेतकऱ्यांना जाळ्यात अडकवले आहे. त्यांनी कर्जमाफी देण्याची नव्हे तर टाळण्याची घोषणा केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याच्या प्रतिक्र ीया या कार्यक्र मावेळी व्यक्त करण्यात आल्या.शेतकरी संपाविषयी नाशिकच्या तरुणांनी त्यात भाग घेऊन गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीच्या सदस्यांना हाताशी धरुन संप फोडल्यावरही त्याच्या सर्वाधिक तीव्र प्रतिक्रिया नाशिकमध्ये उमटून संप सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता. सध्या नाशिकमध्ये सोशल मीडियावर कर्जमाफीविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, अतिशय कठोर शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सरकारवर टीका होत आहे. आजच्या आंदोलनाने कर्जमाफीच्या घोषणेला नवे वळण मिळण्याची शक्यता असून, विविध राजकीय पक्षांकडूनही त्याचे समर्थन केले जात आहे.