शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

कर्जमाफीच्या प्रस्तावाची होळी

By admin | Updated: June 19, 2017 00:21 IST

शासनाकडून फसवणूक : शेतकऱ्यांना दिलासा नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : फडणवीस सरकारच्या मंत्रिगटाचा तत्त्वत: निकषांच्या आधारावर सरसकट कर्जमाफीचा प्रस्ताव फसवा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा नसल्याने शेतकरी वर्गात मोठा रोष निर्माण होत आहे. जर सुकाणू समितीने शासनाच्या अटी मान्य केल्या तर सुकाणू समितीला शेतकरी कदापि माफ करणार नाही, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. सरसकट कर्जमाफी निर्णयाच्या निषेधचा भाग म्हणून निफाडच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या प्रस्तावाच्या प्रतिची ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रतीकात्मक होळी केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने सुकाणू समितीने तो मान्य करू नये त्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांत जागृती करून पुन्हा एकदा आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.कर्जमाफीचे निकष म्हणजे भाकरीपेक्षा भोकरच जड अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची खातेफोड झालेली नसते. त्याच्याकडे ट्रॅक्टर तर असतोच. याशिवाय बाजार समितीत शेतमाल नेण्यासाठी कर्ज काढून जीप किंवा चारचाकी वाहन खरेदी अपरिहार्य आहे. हल्ली शहरात तर सर्वसाधारण व्यक्तीकडे वाहन असते. दुचाकीपेक्षा जुनी चारचाकी स्वस्त अन् प्रत्येक कोपऱ्यावर एजंटांनी त्याची दुकाने थाटलेली असतात. शेतीवर पोट भरत नाही म्हणून कोणी पानपट्टी गोळ्या बिस्किटांचे दुकान, पानटपरी काढली तर त्यालाही नोंदणी करावी लागते. उत्पन्न मात्र शंभर, दिडशे रुपयांवर नसते. त्यालाही कर्ज हवे तर बँका इन्कमटॅक्स रिटर्नची प्रत मागते, म्हणून युवक रिटर्न भरतात. आता हे सगळेच त्यांच्या मुळावर आले आहे. सरकारने शेतकऱ्यांना जाळ्यात अडकवले आहे. त्यांनी कर्जमाफी देण्याची नव्हे तर टाळण्याची घोषणा केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याच्या प्रतिक्र ीया या कार्यक्र मावेळी व्यक्त करण्यात आल्या.शेतकरी संपाविषयी नाशिकच्या तरुणांनी त्यात भाग घेऊन गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीच्या सदस्यांना हाताशी धरुन संप फोडल्यावरही त्याच्या सर्वाधिक तीव्र प्रतिक्रिया नाशिकमध्ये उमटून संप सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता. सध्या नाशिकमध्ये सोशल मीडियावर कर्जमाफीविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, अतिशय कठोर शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सरकारवर टीका होत आहे. आजच्या आंदोलनाने कर्जमाफीच्या घोषणेला नवे वळण मिळण्याची शक्यता असून, विविध राजकीय पक्षांकडूनही त्याचे समर्थन केले जात आहे.