शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दसरा मेळावा शंभर लोकांत करा, अन्यथा शिवसेनेवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 17:40 IST

कोरोनाच्या पार्शभूमीवर शिवसेनेने शिवाजीपार्कवर केवळ शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा अन्यथा शिवसेनेला कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.

ठळक मुद्दे शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करारामदास आठवले यांचा शिवसेनेला इशारा

नाशिक : कोरोनाच्या पार्शभूमीवर शिवसेनेने शिवाजीपार्कवर केवळ शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा अन्यथा शिवसेनेला कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.

राज्यातील कोरोनाचा स्थिती पाहता यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्धपौर्णिमा तथा गणेशोत्सव अतिशय साध्यापणाने साजरा करण्यात आला आहे. त्यानुसार शिवसेनेनेही शिवाजीपार्कवर झेंडे लावून शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा. अन्यथा काद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच शिवसेनेवर कारवाई करावी लागेल असा चिमटाही त्यांनी काढला. यावेळी राज्यातील महाआघाडी सरकारला टिकेचे लक्ष करीत महाराष्ट्र एक नंबरवर पोहोचला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांमुळे नव्हे, तर कोरोनामुळे असा टोला लगावला. राज्यातील सरकार सध्या तीन चाकांवर चालले असून असे सरकार दिर्घ काळ चालणार नसल्याचे भाकितही त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्राकडे १० हजार कोटींची मागणी केली आहे. परंतु, तत्काळ एवढी मदत शक्य नाही.त्यामुळे राज्य सरकारने कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करावी असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान, मराठा मराठा समाजाचा ओबीसीत समावेश न करता स्वतंत्र आरक्षण मिळायला हवे अशीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांवर काँग्रेस राष्ट्रवादीचा दबाव

केंद्रीय मंत्रीमंडळाने मंदीरे खुली करण्यासंदर्भात निर्णय घेतला असून भाविकांच्या मागणीनुसार राज्यातील मंदीरेही खुली करण्याची गरज आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन करून मंदिरे उघडणे शक्य आहे. परंतु, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सत्तेत सहभागी असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबाव असल्यानेच ते मंदीरे उघडण्याचा निर्णय घेत नसल्याचा आरोपही रामदास आठवले यांनी केला आहे.

ड्रग्स घेणाऱ्या अभिनेत्रींना टाळा

बॉलीवूडमधील चित्रपट निर्मात्यांनी ड्रग्स घेणाऱ्या अभिनेत्रींना काम देऊन नये, अन्यथा अशा निर्मात्यांचे चित्रपट प्रदर्शीत होऊ देणार नाही असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे बॉलीवूड मुंबईतच राहणार असून ते इतरत्र हलविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेShiv Senaशिवसेना