शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

दसरा मेळावा शंभर लोकांत करा, अन्यथा शिवसेनेवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 17:40 IST

कोरोनाच्या पार्शभूमीवर शिवसेनेने शिवाजीपार्कवर केवळ शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा अन्यथा शिवसेनेला कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.

ठळक मुद्दे शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करारामदास आठवले यांचा शिवसेनेला इशारा

नाशिक : कोरोनाच्या पार्शभूमीवर शिवसेनेने शिवाजीपार्कवर केवळ शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा अन्यथा शिवसेनेला कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.

राज्यातील कोरोनाचा स्थिती पाहता यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्धपौर्णिमा तथा गणेशोत्सव अतिशय साध्यापणाने साजरा करण्यात आला आहे. त्यानुसार शिवसेनेनेही शिवाजीपार्कवर झेंडे लावून शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा. अन्यथा काद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच शिवसेनेवर कारवाई करावी लागेल असा चिमटाही त्यांनी काढला. यावेळी राज्यातील महाआघाडी सरकारला टिकेचे लक्ष करीत महाराष्ट्र एक नंबरवर पोहोचला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांमुळे नव्हे, तर कोरोनामुळे असा टोला लगावला. राज्यातील सरकार सध्या तीन चाकांवर चालले असून असे सरकार दिर्घ काळ चालणार नसल्याचे भाकितही त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्राकडे १० हजार कोटींची मागणी केली आहे. परंतु, तत्काळ एवढी मदत शक्य नाही.त्यामुळे राज्य सरकारने कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करावी असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान, मराठा मराठा समाजाचा ओबीसीत समावेश न करता स्वतंत्र आरक्षण मिळायला हवे अशीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांवर काँग्रेस राष्ट्रवादीचा दबाव

केंद्रीय मंत्रीमंडळाने मंदीरे खुली करण्यासंदर्भात निर्णय घेतला असून भाविकांच्या मागणीनुसार राज्यातील मंदीरेही खुली करण्याची गरज आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन करून मंदिरे उघडणे शक्य आहे. परंतु, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सत्तेत सहभागी असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबाव असल्यानेच ते मंदीरे उघडण्याचा निर्णय घेत नसल्याचा आरोपही रामदास आठवले यांनी केला आहे.

ड्रग्स घेणाऱ्या अभिनेत्रींना टाळा

बॉलीवूडमधील चित्रपट निर्मात्यांनी ड्रग्स घेणाऱ्या अभिनेत्रींना काम देऊन नये, अन्यथा अशा निर्मात्यांचे चित्रपट प्रदर्शीत होऊ देणार नाही असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे बॉलीवूड मुंबईतच राहणार असून ते इतरत्र हलविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेShiv Senaशिवसेना