शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास जागा

By admin | Updated: May 11, 2015 01:39 IST

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास जागा

नाशिक : महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास जागा झाला अन् त्यांची गाथा ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. निमित्त होते ‘कलांगण’ उपक्रमात संकेत नेरकर यांच्या ‘जेव्हा गड बोलू लागतात’ या कार्यक्रमाचे. यासह पोलीस बॅण्डचे वादन, नृत्य व ध्वनिचित्रफितीच्या सादरीकरणाने हा कार्यक्रम रंगला. परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. दर रविवारी सायंकाळी शहरातील मोकळ्या चौकात कार्यक्रम आयोजित करून त्याद्वारे स्थानिक लोककलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे आहे. प्रारंभी ग्रामीण पोलीस बॅण्डपथकाने वादन केले. ए. क्यू. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शकील शेख, मार्तंड शिरवंत, दादाजी सोनवणे, हरी भोये, गिरीश अमराळे, साहेबराव बलसाने, एस. एम. गुरव, एस. आर. गुरव आदिंच्या पथकाने ‘बलसागर भारत होवो’, ‘सारे जहॉँ से अच्छा’ या देशभक्तिपर गीतांच्या धून वाजवत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर इनोव्हेशन ग्रुपने गणेशवंदना, वासुदेव, शेतकरी नृत्य, ललाटी भंडार (गोंधळ) ही नृत्ये सादर केली. याशिवाय महाराष्ट्रातील ‘ज्ञानपीठ’विजेत्या साहित्यिकांवर विशेष ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. त्यात वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, विंदा करंदीकर व भालचंद्र नेमाडे यांच्या लेखनकार्याचा परामर्श घेण्यात आला. विवेक अहिरे यांनी स्वागत केले. मीना वाघ यांनी सूत्रसंचालन केले. सावानाचे नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, जिल्हा समन्वयक राजेश जाधव आदिंसह प्रेक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)