शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

महामार्ग विस्तारीकरणातून सेना-भाजपात जुंपली

By admin | Updated: November 3, 2016 00:08 IST

श्रेयवाद : खासदार-आमदारांचे परस्परविरोधी दावे

नाशिक : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून सेना-भाजपात जुंपली असून, केंद्र सरकारच्या अखत्यारितील या प्रश्नावर सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याचे यश असल्याचे सेनेने म्हटले आहे तर भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी गेल्या दीड वर्षापासून आपण केलेल्या प्रयत्नाचे हे फलित असल्याचे म्हटल्याने शहरातील राजकारण रंगले आहे. नाशिकमधून जाणाऱ्या मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्रात व राज्यात कॉँंग्रेस आघाडीची सत्ता असताना झाले असून, सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्घाटनही त्याच काळात करण्यात आले होते. छगन भुजबळ यांच्याकडे त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद होते. त्यानंतर मात्र या महामार्गाच्या विस्तारीकरणातून निर्माण झालेल्या वाहतुकीचे प्रश्न प्रकर्षाने समोर आले होते. काही ठिकाणी अंडरपास, काही ठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती करण्याबाबतचे अनेक प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात येऊन त्याचा पाठपुरावाही करण्यात आला, परंतु २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या मंडळींवर ही जबाबदारी आपसूकच येऊन पडली. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग विस्तारीकरणातील त्रुटी दूर करण्यासाठी कोट्यवधीची कामे मंजूर केली असून, शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ होणार आहे. गडकरी भाजपाचे असल्याने साहजिकच भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी या कामांचे श्रेय घेण्यासाठी बुधवारी पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन गडकरी यांच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच या सर्व कामांना मंजुरी मिळाल्याचे सानप यांनी कार्यकर्त्यांना सांगितले तर त्याच वेळी भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजूर केलेल्या कामांची यादी प्रसिद्धीमाध्यमांसमोर ठेवून याकामी गेल्या दीड वर्षापासून आपण गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे म्हटले. भाजपाकडून या कामाचे श्रेय घेतले जात असल्याची कुणकुण शिवसेनेला लागताच, खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकारामुळेच नाशिककरांचा त्रास आता कमी होणार असल्याचा दावा शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे. प्रसिद्धीपत्रक काढून बोरस्ते यांनी, गडकरी यांच्याकडे गोडसे यांनी सातत्याने दिल्ली दरबारी पाठपुरावा केल्याचे हे फलित असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दोन वेळा भेट घेऊन आणि अनेक वेळा पत्राद्वारे पाठपुरावा करून या कामांची मंजुरी मिळविली आहे. राजकारणात मी कोणतेही काम श्रेय घेण्यासाठी करीत नाही. - देवयानी फरांदे, आमदारखासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना गडकरी यांनी हिरवा कंदील दर्शविल्यामुळे इतक्या जलदगतीने कामे सुरू होत आहेत. परंतु या कामाचे श्रेय लाटण्याचे कामही काही जण करीत आहेत. - अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना