शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

१ एप्रिलपासून राज्यात  नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:36 IST

येत्या १ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात उत्पादित होणाऱ्या सर्वच नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसविणे बंधनकारक असून, सदरच्या नंबर प्लेट्स बसवून देण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक कंपन्यांवर आहे.

पंचवटी : येत्या १ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात उत्पादित होणाऱ्या सर्वच नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसविणे बंधनकारक असून, सदरच्या नंबर प्लेट्स बसवून देण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक कंपन्यांवर आहे.कंपनीने वितरकांमार्फत वाहनधारकांना नंबर प्लेट द्याव्या लागणार आहेत. नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसविण्याची अंमलबजावणी होणार असली तरी जुन्या वाहनांबाबत कायदा तयार असून, निर्णयदेखील झाला असला तरी त्याबाबत वितरक किंवा पुरवठादार नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर रजिस्ट्रेशन नंबर व्यतिरिक्त कायमस्वरूपी नंबर तसेच होलोग्राम व आयएनडी असे लिहिलेले असणार आहे. नंबर प्लेट काढण्याचा प्रयत्न केला तर प्लेट तुटेल व बाजारात तशी प्लेटही उपलब्ध होणार नाही. वाहनधारकांना अपघात झाल्यानंतर किंवा कोणी वाहनाची चोरी करताना नंबर प्लेट तुटल्यावर पुन्हा कंपनी किंवा वितरकाशी संपर्क साधावा लागणार आहे.नागरिक संभ्रमातयेत्या १ एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या सर्वच नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादकांकडून दिली जाणार असली तरी जुन्या वाहनांसाठी अशाप्रकारची नंबर प्लेट देण्याबाबतची कुठलीही उपाययोजना सध्या तरी अस्तित्वात नाही. जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटबाबत कुठलीही अधिसूचना अद्याप जारी झाली नसल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNashikनाशिक