दिंडोरी : नागपूर येथील पावर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया यांनी अतिउच्च दाबाची टॉवर लाइन दिंडोरी निफाड व चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेतून नेण्यास होत असलेला विरोध डावलून काम पुन्हा सुरू केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सदरचे काम त्वरित बंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदनही दिंडोरी पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे .पॉवर ग्रीड कंपनीने २०१० साली सर्वेक्षणदेखील केले होते. दिंडोरी निफाड चांदवड तालुक्यातील द्राक्ष बागातून टॉवर लाइन जात आहे. यास कोणत्याही ग्रामपालिकेने ना हरकत दाखला दिलेला नसून शेतकऱ्यांची संमती न घेता नुकसानीचा विचार न करता काम केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकारामुळे द्राक्षबागांचे नुकसान होत आहे. सदर टॉवर लाइन बागायती क्षेत्र व जिरायती क्षेत्रातून न्यावी, असे आदेश जिल्हा नियोजन बैठकीत देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी करून सदर काम त्वरित थांबवून पर्यायी मार्गाने जिरायती क्षेत्रातून लाइन न्यावी, अशी मागणी दिंडोरी, निफाड, चांदवड तालुक्यांतील शेतकऱ्यांनी केली आहे.
अतिउच्च दाब लाइनला बळीराजाचा विरोध
By admin | Updated: July 5, 2014 00:16 IST