शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

अनाधिकृत बांधकामांना उच्च न्यायालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 20:15 IST

येवला : येवल्यातील अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. अतिक्र मणावरील स्थगीती आदेशाचे दावे जास्तीत जास्त सहा महीन्यात निकाली काढण्याचे आदेश उच्च न्यायलायाने एका सुनावणीमध्ये दिले आहेत.येवले येथील सामाजिक कार्यकर्ता दीपक पाटोदकर यांनी सन २००२ मध्ये उच्च न्यायालयात सिटी सर्वे क्र मांक ३९०७,३९०८, ३८०७,३८०८ मधील बेकायदेशीर बांधकामा ...

येवला : येवल्यातील अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. अतिक्र मणावरील स्थगीती आदेशाचे दावे जास्तीत जास्त सहा महीन्यात निकाली काढण्याचे आदेश उच्च न्यायलायाने एका सुनावणीमध्ये दिले आहेत.येवले येथील सामाजिक कार्यकर्ता दीपक पाटोदकर यांनी सन २००२ मध्ये उच्च न्यायालयात सिटी सर्वे क्र मांक ३९०७,३९०८, ३८०७,३८०८ मधील बेकायदेशीर बांधकामा विरु द्ध जनहीत याचिका दाखल केली होती. या याचीकेतील वेळोवेळी झालेल्या निर्णयानुसार येवला नगरपालिकेने येथील शेकडो बांधकामे जमीनदोस्त केली होती. त्या ठिकाणी जनहीत याचिकेतील निर्णयाचा अवमान करु न काही व्यवसायिकांनी पुन्हा दुकाने थाटली होती. या बाबतीत पाटोदकर यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. ही अनिधकृत बांधकामे नियमीत करण्याचा घाट काहीनी घातला होता. अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी त्या संदर्भात उच्च न्यायालयात सुचक वक्तव्य केलेले होते. परंतु पाटोदकर यांनी तीव्र विरोध केला. अशी सर्व परीस्थिती असताना त्या भुखंडामधील ७ अतिक्र मण धारकांना पुर्वीच वेगवेगळ्या न्यायालयात धाव घेऊन मनाई हुकुम मिळवण्यात यश आले होते. शहरातील इतर अनिधकृत बांधकामे पडत असताना काहींना मनाई हुकूम मिळाल्याने त्यांची बांधकामे ताठ मानेने उभी होती. अनधिकृत बांधकामे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे ते पाडण्यात आले नव्हते.दरम्यानच्या काळात पालीकेने ३ बांधकामे मनाई हुकुम उठवुन पाडली. परंतु त्या पैकी ४ बांधकामे पाडण्यात आली नव्हती. म्हणून उच्च न्यायालयातील जनहीत याचीकेत न्याय प्रविष्ठ असलेले दावे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे, यासाठी पाटोदकर यांनी दिवाणी अर्ज सन २०१४ मध्ये दाखल केले होते. हे दावे लवकरात लवकर निकाली काढावे यासाठी पाटोदकर यांनी नगरपालीका प्रशासन व मुख्य जिल्हा न्यायालय यांच्याशीही सतत पत्रव्यवहार करु न पाठपुरावा केला होता. परंतु त्या संदर्भात अनेक महीन्याचा कालावधी जावुनही नगरपालिका प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊस उचलले नव्हते व अहवालही दिला नव्हता.उच्च न्यायालयातील जनहीत याचीकेतील अर्जात न्यायाधीश रंजीत मोरे व अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने ३० जुलै २०१८ रोजी निकाल पारीत केला. त्यास उच्च न्यायालयाने निकालाची प्रत मिळाल्यापासून नियमीत दिवाणी अपिल जलदगतीने ६ महीन्याचे आत निकाली काढण्यात यावे. असे निफाड येथील जिल्हा न्यायालय यांना निर्देश दिले आहेत. तसेच येवले येथील दिवाणी न्यायालय यांना दिवाणी मुकदमा क्र . १९९/२००० जलद गतीने १ वर्षाचे आत निकाली काढण्यात यावे, असे निर्देश दिले. यामुळे पाटोदकर यांचा सदरचा अर्ज निकाली निघाला. यासाठी याचिकाकर्ते दिपक पाटोदकर यांच्यातर्फे अ‍ॅड. ए. आर. एस. बक्षी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Nashikनाशिक