शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

नदीपात्राचा संकोच कायम; अतिक्रमणे ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:50 IST

नाशिक : गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या शहराला पुराचा धोका नव्हता असेनाही, परंतु गेल्या काही वर्षात गोदावरी अन्य तीन नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात बांधकामे करून नदीपात्र संकुचित करण्यात आले आहेत.

नाशिक : गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या शहराला पुराचा धोका नव्हता असेनाही, परंतु गेल्या काही वर्षात गोदावरी अन्य तीन नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात बांधकामे करून नदीपात्र संकुचित करण्यात आले आहेत. २००८नंतर हा प्रश्न प्रामुख्याने आढळला असला तरी बांधकामांवर कारवाई मात्र झालेली नाही. इतकेच नव्हे तर सुधारित पूररेषेत महापालिकेने केलेली बांधकामे जैसे थे आहेत. गोदावरी, नासर्डी, वाघाडी आणि वालदेवी या तीन प्रमुख नद्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नदीपात्राचा अतिक्रमणांमुळे संकोच होत असतानादेखील पाटबंधारे खात्याचा ना हरकत दाखला मिळाला म्हणून नदीकाठावर सर्रास बांधकामे करण्यास परवानग्या देण्यात आल्या. २००८ मध्ये शहरातील सर्वच नद्यांना महापूर आल्यानंतर नदीपात्रालगत बांधकामे झालीच कशी याचाशोध घेताना अनेक बाबी उघड झाल्या होत्या. १९९३-९५ दरम्यान, महापालिकेचा पहिला शहर विकास आराखडा मंजूर करण्यात आला. त्यावेळी सुरुवातीला प्रारूप आराखड्यात गोदावरी नदीलगत असलेली बफर्स झोनची रेषा अंतिम आराखड्यात गायब झाल्याचे आढळले होते. त्यानंतर प्रशासनाने जलसंपदा विभागाकडून पूररेषा आखून घेतली असली तरी अगोदर महापालिकेने ज्या बांधकामांना परवानग्या दिल्या ती बांधकामे आजही नदीपात्र संकुचित करीत आहेत. नदीपात्रालगतची कोणतीही पक्की बांधकामे हटली नाहीत, उलट आखलेली पूररेषा कमी करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आटापिटा सुरू आहे. जी बांधकामे झाली आहेत, त्याच्या मालकांनी न्यायालयात जाऊन हा विषय आणखी घोळात ठेवली आहेत.   नदीपात्रांच्या संकोचाचा प्रश्न केवळ गोदावरी नदीपुरता मर्यादित नाहीतर नासर्डी, वाघाडी आणि वालदेवीबाबतदेखील आहेत. तेथील बांधकामेदेखील हटलेली नाहीत. गोदावरी नदीच्या प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयातील याचिकेच्या अनुषंघाने मुंबई उच्च न्यायालयाने गोदावरी नदीपात्रातील बांधकामे हटविण्याचे आदेश दिले होते. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्या अनुषंघाने काही मंगल कार्यालये आणि लॉन्स हटविली होती. नंतर मात्र, सर्व कार्यवाही बंदच आहे. नदीपात्रातील गोरगरिबांच्या झोपड्या हटविल्या जातात, परंतु अन्य निवासी मिळकती, व्यापारी संकुले व अन्य बांधकामे ‘जैसे थे’ आहेत.---------एकही बांधकाम हटविण्यात आलेले नाहीमहापालिकेची बांधकामे ‘जैसे थे’ केवळ खासगी नव्हे तर महापालिकेसह अन्य शासकीय बांधकामेदेखील नदीपात्रालगत असून, तेही नदीपात्राचा संकोच करीत आहेत. महापालिकेचा गोदापात्र, पंचवटीतील गणेशवाडी येथील भाईमंडई, गणेशवाडी येथील अभ्यासिका, अशी अनेक बांधकामे आहेत, तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने नासर्डी नदीलगत समाज कल्याण खात्याचे कार्यालये आणि वसतिगृह बांधले आहेत. त्यातील एकही बांधकाम अद्याप हटविण्यात आलेले नाही.एकीकडे पूररेषतील बांधकामे हटविण्याचे आव्हान महापालिकेला पेलता येत नाही आणि दुसरीकडे पूररेषा कमी करण्याचे घाटत आहे. काहीही उपाययोजना करून पूररेषा कमी करून नदीपात्रातील बांधकामे वाचविण्याचे प्रयत्न असून, त्यात अनेक लोकप्रतिनिधी पुढाकार घेत आहेत, हे विशेष होय.(क्रमश:)

टॅग्स :Nashikनाशिक