शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हेल्पलाईन १०९१ : ग्रामिण भागातील महिलांवरील अन्याय-अत्याचार रोखणार ‘दामिनी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:49 IST

विवाहितेचा विविध कारणांवरुन होणारा छळ, अन्याय, मुलींची छेडछाड, हत्त्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामिण पोलीस दलाकडून ‘आता बस्स..!’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. तसेच महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखून अपात्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी ग्रामिण भागात ‘दामिनी’ पथक धावणार आहे. या पथकाच्या स्वतंत्र वाहनांना मंगळवारी (दि.२६) हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

ठळक मुद्दे‘दामिनी’ पथकाकडून तत्काळ संकटसमयी महिलांना मदत ‘१०९१’वर संपर्क साधल्यास तत्काळ महिला पोलीस अधिकारी मदतीसाठी पोहचेल ग्रामिण पोलीस दलाकडून ‘आता बस्स..!’ हे अभियान हाती घेण्यात आले

नाशिक : विवाहितेचा विविध कारणांवरुन होणारा छळ, अन्याय, मुलींची छेडछाड, हत्त्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामिण पोलीस दलाकडून ‘आता बस्स..!’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. तसेच महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखून अपात्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी ग्रामिण भागात ‘दामिनी’ पथक धावणार आहे. या पथकाच्या स्वतंत्र वाहनांना मंगळवारी (दि.२६) हिरवा झेंडा दाखविण्यात आला.निमित्त होते, जिल्ह्याच्या ग्रामिण पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित ‘सखी’ मेळाव्याचे. व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, अभिनेत्री प्रिया तुळजापुरकर, योगा प्रशिक्षक प्रज्ञा पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निवेदिता पवार, बचत गटाच्या आश्विनी बोरस्ते, अ‍ॅड. दिपाली खेडकर, पोलीस अधिक्षक संजय दराडे, उपअधिक्षक अतुल झेंडे, अपर उपअधिक्षक विशाल गायकवाड, रोहिणी दराडे, दिपिका झेंडे, प्रियंका दराडे आदि उपस्थित होते.यावेळी शहरासह ग्रामिण भागातील त्र्यंबकेश्वर, पेठ, देवळा, येवला, सटाणा, कळवण, सिन्नर, मनमाड, चांदवड आदि तालुक्यांमधील गावागावांतून विविध शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी दराडे म्हणाले, आधुनिक युगात पुरूषांच्या तुलनेत महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही; मात्र महिला, युवतींच्या बाबतीत घडणाºया गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनाही वाढल्या आहेत. यासाठी महिलांनी सक्षम होऊन त्याविरोधात जागरुकता दाखवून सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणे व पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. यासाठी पुरक ठरणारा ‘आता बस्स...!’ हे अभियान ग्रामिण पोलीस दलाकडून राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे चार हजाराहूंन अधिक महिला या सखी मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

असे आहे पथक ; करा १०९१वर संपर्क‘दामिनी’ पथकाकडून तत्काळ संकटसमयी महिलांना मदत उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासाठी एक मदतवाहिनी क्रमांक देण्यात आला आहे. ‘१०९१’या क्रमांकावर संपर्क साधल्यास तत्काळ महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी मदतीसाठी संबंधितांकडे पोहचेल, असे यावेळी सांगण्यात आले. पथकामध्ये एक महिला पोलीस अधिकारी व चार कर्मचाºयांची एका वाहनावर नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण सहा वाहने जिल्ह्याच्या रस्त्यावर धावणार आहेत. चार अधिकारी व २४ महिला कर्मचाºयांचे ‘दामिनी’ पथक आहे.