शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

मुलांच्या सहकार्याने चिमणी संवर्धनाचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:53 IST

अन्न, पाणी आणि निवारा या मनुष्याप्रमाणेच पशुपक्ष्यांच्यादेखील मूलभूत गरजा आहेत. मनुष्याला त्या सहज मिळविता येतात; परंतु पशुपक्ष्यांना संघर्ष करावा लागतो. सध्या उन्हाळा सुरू असल्याने अन्न-पाण्याअभावी अनेक पक्षी मरून पडलेले दिसतात.

नाशिक : अन्न, पाणी आणि निवारा या मनुष्याप्रमाणेच पशुपक्ष्यांच्यादेखील मूलभूत गरजा आहेत. मनुष्याला त्या सहज मिळविता येतात; परंतु पशुपक्ष्यांना संघर्ष करावा लागतो. सध्या उन्हाळा सुरू असल्याने अन्न-पाण्याअभावी अनेक पक्षी मरून पडलेले दिसतात. पक्षी संवर्धन संस्थेने विविध शाळांमधील मुलांच्या सहकार्याने पक्ष्यांसाठी घरटे बनवून त्यांना खाद्य आणि पाणी देण्याची व्यवस्था केली. या सेवाभावी उपक्रमाला आज हजारो मुले आणि कार्यकर्त्यांचे हात लागले आहेत.सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, पशुपक्ष्यांना चारापाण्याची व्यवस्था करावी या भावनेतून अनेक सामाजिक संस्था, संघटना कार्य करीत आहेत. तरीही हा उपक्रम आणखी व्यापक व्हायला हवा, असे पक्षिमित्र संवर्धन संघटना या राज्यपातळीवरील संस्थेला वाटते. त्यातून या संस्थेचे नाशिकमधील संघटक अनिल माळी यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे ठरविले.सिडको परिसरातील मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या माळी यांनी जागतिक चिमणी दिनी विद्यार्थ्यांना टाकाऊपासून टिकाऊ या उपक्रमात चिमणीचे घरटे बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यातून सुमारे एक हजार मुलांनी आपल्या घरातील पुठ्ठे, कागदी व लाकडी खोके, बारीक जाडीचे प्लायवूड आदींपासून आकर्षक अशी चिमण्यांची घरटी तयार केली. या उपक्रमात सुमारे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पक्षिमित्र दिगंबर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब नाशिक वेस्ट, हरित सेना, पर्यावरण मित्र, निसर्ग मित्र आदी विविध सामाजिक संस्था संघटनेचे पराग पाटोदकर, केशव पै, सीमा पछाडे, रवि वामनाचार्य, मधुकर जगताप, प्रदीप चौधरी, प्रतिभा माळी, अनिल तुपे, अपूर्वा जाखडी आदी अनेक कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत. या माध्यमातून रोटरी क्लब नाशिक वेस्ट या संस्थेच्या सहकार्याने मागील वर्षी हजारो घरटी बनविण्यात आली होती.सध्या तप्त उन्हाने साऱ्याच जीवांची काहिली होत आहे. चारा-पाण्याअभावी पशुपक्ष्यांची तडफड सुरू आहे. अशावेळी माणुसकीच्या भावनेतून घराच्या बाल्कनीत जागा असेल तिथे पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे व धान्याचे दाणे ठेवून त्यांची तहान व भूक भागवूया !अनेक मुलांना आपल्या घराच्या परिसरात ही घरटी लावली असून, मुले त्यात धान्य टाकतात. महाराष्ट्र राज्य वनविभागाच्या राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब हा उपक्रम अनेक शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. शहरातील सुमारे २५० शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.पक्षी वाचवा, पर्यावरण वाचवा या उपक्रमात शालेय विद्यार्थी अत्यंत स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात. काही घरटी ही त्र्यंबक नजीकच्या जंगलात खोरीपाडा भागात लावण्यात आली आहेत. यातील निम्म्या घरट्यांमध्ये पक्ष्यांचा वावर असून, त्यांनी तेथे अंडीदेखील घातली आहेत. तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.- अनिल माळी, संघटक,  पक्षिमित्र संघटना

टॅग्स :Nashikनाशिक