शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसची प्रवाशांना धडक; अनेकजण जखमी
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरला भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:15 IST

राजापूर : राजापूरला बोअरवेल व विहिरींचे पाणी आटल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई झाली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देटँकरची मागणी : महिलांची भटकंतीटँकर सुरू करण्यासाठी आता महिला रस्त्यावर

राजापूर : राजापूरला बोअरवेल व विहिरींचे पाणी आटल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई झाली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.लोहशिंगवे शिवारातून राजापूर गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो; मात्र विहीर बोअरवेलचे पाणी आटल्याने पंधरा दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यापूर्वी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा होत होता. गाव परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे, पाणी कुठे मिळेल का? या शोधात महिला, पुरुष मंडळी दिसत आहे. गावची पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी कुचकामी ठरली आहे.लाखो रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना पाण्यात जाणार आहे. ग्रामपंचायत भरपूर प्रयत्न करते; मात्र यश येत नाही, सत्ता कोणत्याही गटाची असो पाण्याची वनवण असतेच. त्यामुळे महिला व ग्रामस्थ नाराज राहतात. कायमस्वरूपी पाणीपुरवठा नसल्याने महिलावर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावचा कितीही विकास करा; मात्र उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी राहत नाही. ही तर खेदाची बाब आहे. गावासाठी वडपाटी पाझर तलावातून पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पाणी नसल्याने रोजचे पाणी विकत घेऊन व आंघोळ व धुणे भांड्यासाठी खासगी टँकरवाल्याकडून पाणी विकत घेताना दिसत आहे. आजपर्यंत या पाणीपुरवठा योजनेवर लाखो रुपये खर्च झालेल्या दिसत आहे; मात्र गावाला पाणी नाही ही शोकांतिका आहे. पाण्याअभावी नोकरदार वर्ग तालुक्याच्या ठिकाणी निघून गेले आहे. टँकर सुरू करण्यासाठी आता महिला रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही, असे चित्र सध्या दिसत आहे.