शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

अति पावसाने पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 15:05 IST

खेडलेझुंगे : जिल्ह्यात अतिपावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे सडलेल्या पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे झालेले नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : पिकांचे सर्वेक्षण नसल्याने शेतकरी मदतीला मुकणार

खेडलेझुंगे : जिल्ह्यात अतिपावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे सडलेल्या पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे झालेले नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा असतांना नुकसानीचे सर्वेक्षण, पंचनामे करायला यंत्रणाच उपलब्ध नव्हती त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कोट्यावधी शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.खेडलेझुंगे, रूई, कोळगांव, सारोळे थडी, धारणगांव विर व खडक परिसरात दोन वर्षापासुन शेतीतून पुरेसे उत्पादन नसल्याने मुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयणीय झालेली आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला हा भाग दुष्काळाने होरपळत होता. जुलै आॅगस्ट महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. आज परतीचा पाऊस जोरात होत असल्याने शेतात पाणी साचून राहिल्याने कांद्याची रोप, टोमॅटो, मका, बाजरी, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नाले, ओढे, पाट, चाºया वाहत आहेत. त्यामुळे त्यातील जास्तीचे पाणी ही नाले, चाºया, ओढे संबंधित यंत्रणेकडून साफसफाई न झाल्याने त्यातील पाणी शेतातुन वाहत असल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले आहे. यावर्षी पाऊस उशिरा आल्याने आणि भर जोमात पीक असतांना पाण्याचा खंड पडल्याने पिकांचे उत्पादन घटले आहे.कर्जाचा डोंगर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे. अशातच परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. नुकसान झाल्याने शेतकºयांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. परंतु ़निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु होती. निवडणूक पार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतलेली असल्याने पिकांचे सर्वेक्षण, पंचनामे करणार कोण असा प्रश्न शेतकर्यांना पडला होता. निवडणुकीच्या कामामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. शासनाने दिपावलीच्या सुट्टीमध्ये शासकीय यंत्रणेला नुकसान ग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देवुन लवकरात लवकर पंचनामे करु न मदत मिळवुन द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक