शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

अति पावसाने पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 15:05 IST

खेडलेझुंगे : जिल्ह्यात अतिपावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे सडलेल्या पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे झालेले नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : पिकांचे सर्वेक्षण नसल्याने शेतकरी मदतीला मुकणार

खेडलेझुंगे : जिल्ह्यात अतिपावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे सडलेल्या पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे झालेले नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा असतांना नुकसानीचे सर्वेक्षण, पंचनामे करायला यंत्रणाच उपलब्ध नव्हती त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कोट्यावधी शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.खेडलेझुंगे, रूई, कोळगांव, सारोळे थडी, धारणगांव विर व खडक परिसरात दोन वर्षापासुन शेतीतून पुरेसे उत्पादन नसल्याने मुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयणीय झालेली आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला हा भाग दुष्काळाने होरपळत होता. जुलै आॅगस्ट महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. आज परतीचा पाऊस जोरात होत असल्याने शेतात पाणी साचून राहिल्याने कांद्याची रोप, टोमॅटो, मका, बाजरी, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नाले, ओढे, पाट, चाºया वाहत आहेत. त्यामुळे त्यातील जास्तीचे पाणी ही नाले, चाºया, ओढे संबंधित यंत्रणेकडून साफसफाई न झाल्याने त्यातील पाणी शेतातुन वाहत असल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले आहे. यावर्षी पाऊस उशिरा आल्याने आणि भर जोमात पीक असतांना पाण्याचा खंड पडल्याने पिकांचे उत्पादन घटले आहे.कर्जाचा डोंगर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे. अशातच परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. नुकसान झाल्याने शेतकºयांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. परंतु ़निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु होती. निवडणूक पार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतलेली असल्याने पिकांचे सर्वेक्षण, पंचनामे करणार कोण असा प्रश्न शेतकर्यांना पडला होता. निवडणुकीच्या कामामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. शासनाने दिपावलीच्या सुट्टीमध्ये शासकीय यंत्रणेला नुकसान ग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देवुन लवकरात लवकर पंचनामे करु न मदत मिळवुन द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक