शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देवगाव परिसराला मुसळधार पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST

▪️तीन दिवसांपासून संततधार : विद्युत रोहित्रात तांत्रिक बिघाड ; तब्बल दोन तास बत्ती गूल तीन दिवसांपासून संततधार : विद्युत ...

▪️तीन दिवसांपासून संततधार : विद्युत रोहित्रात तांत्रिक बिघाड ; तब्बल दोन तास बत्ती गूल

तीन दिवसांपासून संततधार : विद्युत रोहित्रात तांत्रिक बिघाड ; तब्बल दोन तास बत्ती गूल

देवगाव (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुष्य नक्षत्राच्या पावसाने हाहाकार माजविल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून देवगाव परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे देवगाव येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन तब्बल २४ तास उलटूनही वीज पुरवठा पूर्ववत झाला नसल्याने देवगावकरांना ऐन पावसाळ्यात अंधाराचा सामना करावा लागत आहे.

पुष्य नक्षत्राने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधारेमुळे वीज पुरवठा खंडित होऊन बत्ती गूल झाली आहे. देवगावसह वावीहर्ष, श्रीघाट, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, चंद्राचीमेट, आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्ष आदी परिसरात मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांची नदी ओहोळांवर चांगलीच झुंबड उडत असून मासेमारी करणाऱ्यांची चंगळ झाली आहे. पाच ते सहा दिवसांपासून रात्रंदिवस सतत पाऊस कोसळत असल्यामुळे आवणा-आवणांमध्ये पाणी साठून देवगाव परिसर जलमय झाला आहे.

---------------------------

शेतीच्या कामांना ब्रेक

देवगाव परिसरात मुसळधार पावसासह संततधार सुरू असल्याने घरांच्या छपरातून पाणी झिपरत असल्याने बहुतेक नागरिकांच्या घरांमध्ये ओलावा निर्माण झाला आहे. पावसाच्या वेगाची तीव्रता खूप असून त्यात वारा वादळामुळे नागरिकांना थंडीत कुडकुडत बसावे लागत आहे. कोसळणारा पाऊस सतत चालू असल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना ब्रेक दिला आहे. जोरदार पावसाच्या आघातामुळे देवगाव येथील वीज पुरवठा तब्बल दोन ते तीन दिवसांपासून खंडित झाल्याने देवगावमध्ये अंधार दाटला आहे.

--------------------

विद्युत पुरवठा खंडित

एकीकडे पावसामुळे शेतकरी समाधानी आहे. मात्र, विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रात्रीच्या काळोखात दिवस काढावे लागत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून मुसळधार पावसाच्या दिवसात काळोखात रात्र घालवावी लागत आहे. महावितरण विभागाने त्वरित उपाययोजना करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिक करत आहेत.