शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

देवगाव परिसराला मुसळधार पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST

▪️तीन दिवसांपासून संततधार : विद्युत रोहित्रात तांत्रिक बिघाड ; तब्बल दोन तास बत्ती गूल तीन दिवसांपासून संततधार : विद्युत ...

▪️तीन दिवसांपासून संततधार : विद्युत रोहित्रात तांत्रिक बिघाड ; तब्बल दोन तास बत्ती गूल

तीन दिवसांपासून संततधार : विद्युत रोहित्रात तांत्रिक बिघाड ; तब्बल दोन तास बत्ती गूल

देवगाव (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुष्य नक्षत्राच्या पावसाने हाहाकार माजविल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून देवगाव परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे देवगाव येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन तब्बल २४ तास उलटूनही वीज पुरवठा पूर्ववत झाला नसल्याने देवगावकरांना ऐन पावसाळ्यात अंधाराचा सामना करावा लागत आहे.

पुष्य नक्षत्राने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधारेमुळे वीज पुरवठा खंडित होऊन बत्ती गूल झाली आहे. देवगावसह वावीहर्ष, श्रीघाट, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, चंद्राचीमेट, आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्ष आदी परिसरात मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांची नदी ओहोळांवर चांगलीच झुंबड उडत असून मासेमारी करणाऱ्यांची चंगळ झाली आहे. पाच ते सहा दिवसांपासून रात्रंदिवस सतत पाऊस कोसळत असल्यामुळे आवणा-आवणांमध्ये पाणी साठून देवगाव परिसर जलमय झाला आहे.

---------------------------

शेतीच्या कामांना ब्रेक

देवगाव परिसरात मुसळधार पावसासह संततधार सुरू असल्याने घरांच्या छपरातून पाणी झिपरत असल्याने बहुतेक नागरिकांच्या घरांमध्ये ओलावा निर्माण झाला आहे. पावसाच्या वेगाची तीव्रता खूप असून त्यात वारा वादळामुळे नागरिकांना थंडीत कुडकुडत बसावे लागत आहे. कोसळणारा पाऊस सतत चालू असल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना ब्रेक दिला आहे. जोरदार पावसाच्या आघातामुळे देवगाव येथील वीज पुरवठा तब्बल दोन ते तीन दिवसांपासून खंडित झाल्याने देवगावमध्ये अंधार दाटला आहे.

--------------------

विद्युत पुरवठा खंडित

एकीकडे पावसामुळे शेतकरी समाधानी आहे. मात्र, विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रात्रीच्या काळोखात दिवस काढावे लागत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून मुसळधार पावसाच्या दिवसात काळोखात रात्र घालवावी लागत आहे. महावितरण विभागाने त्वरित उपाययोजना करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिक करत आहेत.