शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. धुवाधार पावसाने नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा ...

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. धुवाधार पावसाने नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, तर कसारा घाटात दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक पहाटेपर्यंत विस्कळीत झाली होती. दरम्यान, रेल्वे वाहतुकीलाही याचा फटका बसल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

इगतपुरी तालुक्यात विक्रमी पाऊस

इगतपुरी शहरासह तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे दारणा, वाकी, भाम या नद्यांना पूर आला आहे. इगतपुरी तालुक्यात २४ तासांत २४०, घोटी १३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे भावली धरणात ८६ टक्के जलसाठा, दारणा धरणात ७३ टक्के, मुकणे ३४.५५, टक्के, भाम धरणात ३३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी घर, समाजमंदिर, शाळांची पडझड झाली.

त्र्यंबकेश्वरला दाणादाण, भूस्खलन

त्र्यंबकेश्वर परिसरातील गाव, वाडे-पाड्यांवर पावसाने दाणादाण उडवली. ठिकठिकाणी दरड कोसळणे, भूस्खलन होणे यासह नदी-नाले, ओहोळांना पूरस्थिती उद‌्भवली. श्रीघाट - सावरपाडा येथे दरड व भूस्खलन होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओढे, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

पेठ तालुक्याचा संपर्क तुटला

पेठ तालुक्याला पावसाने झोडपून काढले. घाट रस्त्यावर दरडी कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. करंजाळी ते हरसूल राज्य मार्गावर दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

मनमाडला रेल्वे वाहतूक विस्कळीत

अतिवृष्टीमुळे काही रेल्वेगाड्या रद्द, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला. रद्द गाड्यांमध्ये पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. मंगला एक्स्प्रेस मनमाड दौंडमार्गे धावत असून, अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आठ ते दहा तास उशिराने धावत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला.

मनमाडला रेल्वे वाहतूक विस्कळीत

अतिवृष्टीमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. काही रद्द, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला. रद्द गाड्यांमध्ये पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. मंगला एक्स्प्रेस मनमाड दौंडमार्गे धावत असून, अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. पावसामुळे लांबपल्ल्याच्या गाड्या आठ ते दहा तास उशिराने धावत आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला.

कसारा घाटात दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे कसारा घाटात चार दिवसांत दुसऱ्यांदा दरड कोसळून रेल्वे व महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कसाऱ्याहून नाशिककडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. महामार्गावरील जुना कसारा घाटातून दरड हटविण्याचे काम पहाटे ४ वाजता संपल्याने मुंबईहून नाशिकला जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. कोसळलेल्या दरडी व माती हटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे गोरखपूर-हावडा, पवन एक्स्प्रेस, राज्यराणी, पंचवटी, सेवाग्राम, जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. मुंबईहून येणाऱ्या गाड्या वसई, विरारमार्गे तर भुसावळहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या जळगाव - मनमाडमार्गे वळविण्यात आल्या.

चौकट

गंगापूर धरणात ५३ टक्के साठा

त्र्यंबकेश्वर आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील साठा वाढला असून, गुरुवारी (दि.२२) सायंकाळपर्यंत गंगापूर धरणात ३००४ दलघफू म्हणजेच ५३.३५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गंगापूर धरण समूहात मात्र सरासरी ४२ टक्के साठा आहे. कश्यपी धरणात २, गौतमी गोदावरी ३१ तर आळंदी ३९ टक्के इतक साठा झाला आहे.