शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सलग दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस

By admin | Updated: May 29, 2014 00:29 IST

रस्ते जलमय : आठवडे बाजार ठप्प; वृक्ष उन्मळून वाहनांचे नुकसान

रस्ते जलमय : आठवडे बाजार ठप्प; वृक्ष उन्मळून वाहनांचे नुकसाननाशिक : रोहिणी नक्षत्रातील पावसाने आज सलग दुसर्‍या दिवशी वादळीवार्‍यासह हजेरी लावली. यामुळे गंगाघाटावरील आठवडे बाजाराची दैना झाली, तर शहरात आज पुन्हा अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. यात एका ठिकाणी रिक्षाचे, तर काही ठिकाणी दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. शहरात मंगळवारी वादळीवार्‍यासह गारांचा पाऊस झाला होता. यात शेकडो वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान झाले होते, तर झोपडप˜ी परिसरातील घरांचे पत्रे उडाले होते. शेतकर्‍यांच्या पॉली हाऊसचेही मोठे नुकसान झाले होते. आज पुन्हा दुपारच्या सुमारास रोहिणीच्या पावसाने हजेरी लावली. वादळीवार्‍यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. गंगाघाटावर भरलेल्या आठवडे बाजाराची दैना उडवून दिली. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून रस्ते जलमय झाले होते. यामुळे वाहतुकीची कोंडीही झाली होती. आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा असल्याने सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज असताना दुपारीच पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळीवार्‍यामुळे शहराच्या मध्यवस्तीच्या ठिकाणची झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या मोडून पडल्या. जोरदार वार्‍यामुळे आज पुन्हा अनेक घरांचे पत्रे हवेत उडाल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. सुमारे तासभर पावसाने मुख्य रस्ते जलमय झाले, तर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून तळ्यांचे स्वरूप आले होते. पुन्हा तोच कित्ता...मंगळवारच्या पावसामुळे शहरात शेकडो झाडे उन्मळून पडली होती. मुख्य रस्त्यावरील झाडे हटविण्यात आली असली तरी आज दिवसभर इतर झाडे, फांद्या हटविण्याचे काम अग्निशमन दलाकडून केले जात असतानाच आज दुसर्‍या दिवशीही पुन्हा वादळीवार्‍यासह पावसाने हजेरी लावत पुन्हा झाडे कोलमडली. तपोवनातली काही झाडे पडली, तर सराफ बाजारातील काही ठिकाणी पत्रे उडाल्याने नुकसान झाले. कॉलेजरोडच्या पाटील लेन -२ येथेही झाड कोसळले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत गट कार्यालयासमोरचे झाडही उन्मळून पडले. जुन्या नाशकातील नाईकपुर्‍यात झाडाची फांदी तुटून पडल्याने रिक्षाचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे पंडित कॉलनी, आनंदवली परिसरातही झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. पाणी तुंबलेसुमारे तासभर झालेल्या पावसाने जागोजागी पाणी तुंबले होते. राजीव गांधी भवन, सराफ बाजार, मेनरोड यांसह उपनगरीय परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. मुसळधार पाऊस असल्याने भुयारी गटारीही तुंबल्या. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.