शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

सलग दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस

By admin | Updated: May 29, 2014 00:29 IST

रस्ते जलमय : आठवडे बाजार ठप्प; वृक्ष उन्मळून वाहनांचे नुकसान

रस्ते जलमय : आठवडे बाजार ठप्प; वृक्ष उन्मळून वाहनांचे नुकसाननाशिक : रोहिणी नक्षत्रातील पावसाने आज सलग दुसर्‍या दिवशी वादळीवार्‍यासह हजेरी लावली. यामुळे गंगाघाटावरील आठवडे बाजाराची दैना झाली, तर शहरात आज पुन्हा अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. यात एका ठिकाणी रिक्षाचे, तर काही ठिकाणी दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. शहरात मंगळवारी वादळीवार्‍यासह गारांचा पाऊस झाला होता. यात शेकडो वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान झाले होते, तर झोपडप˜ी परिसरातील घरांचे पत्रे उडाले होते. शेतकर्‍यांच्या पॉली हाऊसचेही मोठे नुकसान झाले होते. आज पुन्हा दुपारच्या सुमारास रोहिणीच्या पावसाने हजेरी लावली. वादळीवार्‍यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. गंगाघाटावर भरलेल्या आठवडे बाजाराची दैना उडवून दिली. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून रस्ते जलमय झाले होते. यामुळे वाहतुकीची कोंडीही झाली होती. आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा असल्याने सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज असताना दुपारीच पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळीवार्‍यामुळे शहराच्या मध्यवस्तीच्या ठिकाणची झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या मोडून पडल्या. जोरदार वार्‍यामुळे आज पुन्हा अनेक घरांचे पत्रे हवेत उडाल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. सुमारे तासभर पावसाने मुख्य रस्ते जलमय झाले, तर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून तळ्यांचे स्वरूप आले होते. पुन्हा तोच कित्ता...मंगळवारच्या पावसामुळे शहरात शेकडो झाडे उन्मळून पडली होती. मुख्य रस्त्यावरील झाडे हटविण्यात आली असली तरी आज दिवसभर इतर झाडे, फांद्या हटविण्याचे काम अग्निशमन दलाकडून केले जात असतानाच आज दुसर्‍या दिवशीही पुन्हा वादळीवार्‍यासह पावसाने हजेरी लावत पुन्हा झाडे कोलमडली. तपोवनातली काही झाडे पडली, तर सराफ बाजारातील काही ठिकाणी पत्रे उडाल्याने नुकसान झाले. कॉलेजरोडच्या पाटील लेन -२ येथेही झाड कोसळले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत गट कार्यालयासमोरचे झाडही उन्मळून पडले. जुन्या नाशकातील नाईकपुर्‍यात झाडाची फांदी तुटून पडल्याने रिक्षाचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे पंडित कॉलनी, आनंदवली परिसरातही झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. पाणी तुंबलेसुमारे तासभर झालेल्या पावसाने जागोजागी पाणी तुंबले होते. राजीव गांधी भवन, सराफ बाजार, मेनरोड यांसह उपनगरीय परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. मुसळधार पाऊस असल्याने भुयारी गटारीही तुंबल्या. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.