शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

राजापूर परिसरात उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 18:16 IST

येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचा चटका बसायला सुरुवात होत असल्याने दुपारी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे.

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचा चटका बसायला सुरुवात होत असल्याने दुपारी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे.ग्रामीण भागात जनावरांना झाडांच्या सावलीत बांधावे लागते आहे. राजापूर व परिसरात उष्णतेची लाट आहे. त्यात लग्नसराई सुरू असल्याने नागरिक उन्हामुळे बऱ्याच लग्नाला जाणे टाळत आहे. जवळचे असेल तर बस, काळीपिवळी, रिक्षाने जाण्याला पसंती देत आहे. रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी रसवंतीची दुकाने थाटली आहेत. यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळत आहे. राजापूर व परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने व उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने गावी जाताना पाणी बाटली व जारच्या पाण्याला नागरिक पसंती देत आहे. वाºयाचा वेगही कमी झाल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जनावरांनाही उष्म्याची झळ बसत आहे. जनावरांना दिवसातून तीनवेळा पाणी पाजावे लागत आहे.या उन्हामुळे दुभत्या गायी दूध कमी देत आहे त्यामुळे दूध उत्पादनावरही परिणाम झाला आहे. तसेच जनावरांना ताप येणे अशा आजाराचा सामना करावा लागतो आहे. दुपारी दीड ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसते. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.(२९ राजापूर)

टॅग्स :NashikनाशिकSummer Specialसमर स्पेशल