शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शहरात उष्मा वाढला; तापमान ३९.४ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:34 IST

शहरात रविवारी (दि.२५) दिवसभर कडक ऊन होते. दुपारी ४.३० वाजेपासून संध्याकाळपर्यंत ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वाराही सुटला. मात्र, कोठेही पावसाच्या सरींचा शिडकावा होऊ शकला नाही. संध्याकाळपर्यंत शहराचे कमाल तापमान ३९.४ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.

नाशिक : शहरात रविवारी (दि.२५) दिवसभर कडक ऊन होते. दुपारी ४.३० वाजेपासून संध्याकाळपर्यंत ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वाराही सुटला. मात्र, कोठेही पावसाच्या सरींचा शिडकावा होऊ शकला नाही. संध्याकाळपर्यंत शहराचे कमाल तापमान ३९.४ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.गेल्या काही दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा उष्मा जाणवू लागला आहे. कमाल व किमान तापमानाचा पारा चढता राहत असल्याने रात्रीच्या वेळीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे नाशिककर वातानुकूलित यंत्रांसह कूलर, पंख्याच्या वापरावर भर देत उकाड्यापासून स्वतःचा बचाव करताना दिसून येत आहेत. रविवारी किमान तापमान २१ अंश इतके नोंदविले गेले. यावरून रात्रीच्या उकड्याचा अंदाज लावता येईल.नाशिक शहरात आठवडाभरापासून तापमानाचा पारा पस्तिशीच्या पुढेच स्थिरावत आहे. मात्र, रविवारी पारा ४० अंशाच्या जवळ पोहोचला. रविवारी उन्हाचा तडाखा आणि शासनाकडून घालण्यात आलेले कडक निर्बंध यामुळे शहरात सर्वत्र दुपारी १२ वाजेपासून रात्रीपर्यंत शुकशुकाट पाहावयास मिळाला. उन्हाची वाढलेली तीव्रता आणि कोरोनाचा वाढत्या फैलावामुळे नाशिककरांनी रविवारी सकाळी ११ वाजेनंतर घारबाहेर पडणे कटाक्षाने टाळले. यामुळे सर्वच परिसर निर्मनुष्य झालेला दिसून आला. दुपारी ४ वाजेपासून हळूहळू ढग दाटून येऊ लागले आणि अर्ध्या तासात सर्वत्र अंधाराचे सावट पसरले. सूर्य दाटलेल्या ढगांमध्ये हरवला. जणू काही मुसळधार पाऊस होईल, असे चित्र निर्माण झाले होते. विजाही चमकू लागल्या आणि काही प्रमाणात मेघगर्जनाही होऊ लागली. मात्र, दाटून आलेले ढग बरसले नसल्याने नाशिककरांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळू शकला नाही.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमान