शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

‘स्वस्थ भारत यात्रा’  आज नाशिक जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:23 IST

समाजातील बदलत्या खानपान पद्धतीमुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मतिथी वर्षानिमित्ताने अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने स्वस्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सातपूर : समाजातील बदलत्या खानपान पद्धतीमुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मतिथी वर्षानिमित्ताने अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने स्वस्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी ही रॅली नाशिक विभागात प्रवेश करीत असून, रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली.  अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने जागतिक अन्न दिवसानिमित्ताने १६ आॅक्टोबरपासून देशाच्या सहा वेगवेगळ्या भागातून सायकल रॅली निघालेल्या आहेत. त्यातील तीन रॅली महाराष्ट्रातून जाणार आहेत. यातील एक रॅली नाशिक विभागातून जात आहे. या रॅलीचे स्वागत मंगळवारी कासारी (नांदगाव) येथे करण्यात येणार आहे. पथनाट्य, लोकनृत्य लेजीम पथक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ढोलताशांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. नाशिक विभागात अहमदनगर, नेवासा, मालेगाव, धुळे व शिरपूर आदी ठिकाणी स्थानिक स्तरावर स्वागत केले जाणार आहे. या प्रत्येक ठिकाणी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृतीसोबतच भेसळी संदर्भातील चाचण्याही करून दाखविल्या जाणार आहेत.शाळांमधून अन्न हेच औषध, आरोग्याची गुरुकिल्ली या विषयांवर पोस्टर व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक वयोगटासाठी अन्नपदार्थ व खानपान पद्धतींबाबत मार्गदर्शक पुस्तिका बनविण्यात आली असल्याची माहिती सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली.अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने जागतिक अन्न दिवसानिमित्ताने देशाच्या जम्मू-काश्मीर, आगरतला, पोंडीचरी, केरळ, गोवा, रांची आदी सहा वेगवेगळ्या भागांतून रॅली निघालेल्या आहेत. त्यातील केरळ (तिरुवानंतपूरम)ची रॅली महाराष्ट्रातून आणि नाशिक विभागातून जात आहे. ही रॅली नांदगाव (कासारी) येथे मंगळवारी येणार असून, नाशिक विभागाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. बुधवारी मालेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ डिसेंबर रोजी ही रॅली नाशिक विभागातून (महाराष्ट्रातून) मध्य प्रदेशात जाणार असल्याने शिरपूरला निरोप दिला जाईल. विविध भागांतून निघालेल्या रॅलीचे २७ रोजी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे.- चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागNashikनाशिक