शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

‘स्वस्थ भारत यात्रा’  आज नाशिक जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:23 IST

समाजातील बदलत्या खानपान पद्धतीमुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मतिथी वर्षानिमित्ताने अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने स्वस्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सातपूर : समाजातील बदलत्या खानपान पद्धतीमुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मतिथी वर्षानिमित्ताने अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने स्वस्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी ही रॅली नाशिक विभागात प्रवेश करीत असून, रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली.  अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने जागतिक अन्न दिवसानिमित्ताने १६ आॅक्टोबरपासून देशाच्या सहा वेगवेगळ्या भागातून सायकल रॅली निघालेल्या आहेत. त्यातील तीन रॅली महाराष्ट्रातून जाणार आहेत. यातील एक रॅली नाशिक विभागातून जात आहे. या रॅलीचे स्वागत मंगळवारी कासारी (नांदगाव) येथे करण्यात येणार आहे. पथनाट्य, लोकनृत्य लेजीम पथक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ढोलताशांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. नाशिक विभागात अहमदनगर, नेवासा, मालेगाव, धुळे व शिरपूर आदी ठिकाणी स्थानिक स्तरावर स्वागत केले जाणार आहे. या प्रत्येक ठिकाणी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृतीसोबतच भेसळी संदर्भातील चाचण्याही करून दाखविल्या जाणार आहेत.शाळांमधून अन्न हेच औषध, आरोग्याची गुरुकिल्ली या विषयांवर पोस्टर व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक वयोगटासाठी अन्नपदार्थ व खानपान पद्धतींबाबत मार्गदर्शक पुस्तिका बनविण्यात आली असल्याची माहिती सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली.अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने जागतिक अन्न दिवसानिमित्ताने देशाच्या जम्मू-काश्मीर, आगरतला, पोंडीचरी, केरळ, गोवा, रांची आदी सहा वेगवेगळ्या भागांतून रॅली निघालेल्या आहेत. त्यातील केरळ (तिरुवानंतपूरम)ची रॅली महाराष्ट्रातून आणि नाशिक विभागातून जात आहे. ही रॅली नांदगाव (कासारी) येथे मंगळवारी येणार असून, नाशिक विभागाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. बुधवारी मालेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ डिसेंबर रोजी ही रॅली नाशिक विभागातून (महाराष्ट्रातून) मध्य प्रदेशात जाणार असल्याने शिरपूरला निरोप दिला जाईल. विविध भागांतून निघालेल्या रॅलीचे २७ रोजी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे.- चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागNashikनाशिक