शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

आरोग्य, सुरक्षेत भर घालणार : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:29 IST

नाशिक : मालेगावमध्ये पुरेसे डॉक्टर्स, पोलीस आणि एसआरपीएफ यंत्रणा आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास ती अजून वाढवून मालेगावमधील कोरोनाचा फैलाव रोखण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. येथील परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील, असे महाराष्टÑाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

नाशिक : मालेगावमध्ये पुरेसे डॉक्टर्स, पोलीस आणि एसआरपीएफ यंत्रणा आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास ती अजून वाढवून मालेगावमधील कोरोनाचा फैलाव रोखण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. येथील परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील, असे महाराष्टÑाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.जिल्ह्यातील मालेगावमध्ये मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ४४ बाधित रुग्ण आढळून आल्याने सर्व यंत्रणांसह जिल्हादेखील हादरून गेला. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आणि विशेषत्वे मालेगावच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आदी मंत्रीदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना देशमुख यांनी सध्याच्या घडीला मालेगावमध्ये १८०० पोलीस तैनात असून, गरज पडल्यास एसआरपीएफचे सुरक्षा दलदेखील वाढवले जाणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय अतिरिक्त ६० डॉक्टर्सची सेवादेखील मालेगावला दिली आहे. पोलीस, आरोग्य यंत्रणा किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेवर हल्ले झाल्यास शासन ते खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय जे पोलीस फ्रंटलाईनवर काम करतात, त्यांना शासनाच्या वतीने पीपीई किटदेखील देण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्याशिवाय राज्यात कुठेही पोलिसांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख आणि वारसांना नोकरी देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यात सर्वच ठिकाणी प्रशासन यंत्रणा दिवस-रात्र लढत असून, मालेगावमध्ये अधिक पोलीस, डॉक्टरांची गरज लागणार का याचा आढावा घेतला जाणार असून, परिस्थिती लवकर कशी आटोक्यात आणता येईल, त्यावर लक्ष केंदित करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही देशमुख यांनी नमूद केले.--------प्रेमाने न समजल्यास पोलिसी खाक्यानागरिकांना प्रेमाने समजावून सांगण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही जर कुणी ऐकत नसेल तर त्यांना पोलिसी खाक्या कसा दाखवायचा ते पोलिसांना माहिती असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. आतापर्यंत १५६ ठिकाणी ५५० जणांवर हल्ले झाले असून, पोलीस किंवा आरोग्य यंत्रणेवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसल्याचेही ते म्हणाले.--------त्याबाबत मुख्यमंत्री ठरवणारमहाराष्ट्र तसेच मुंबईत परप्रांतीय नागरिक, कामगार जास्त असून, त्यांना त्यांच्या गावाला पाठविण्याची सरकारची इच्छा असून, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल. तसेच त्याबाबत अन्य संबंधित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मगच मुख्यमंत्री त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिक