शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
7
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
8
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
9
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
10
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
11
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
12
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
13
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
14
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
15
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
16
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
17
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
19
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
20
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...

आरोग्य, सुरक्षेत भर घालणार : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:29 IST

नाशिक : मालेगावमध्ये पुरेसे डॉक्टर्स, पोलीस आणि एसआरपीएफ यंत्रणा आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास ती अजून वाढवून मालेगावमधील कोरोनाचा फैलाव रोखण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. येथील परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील, असे महाराष्टÑाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

नाशिक : मालेगावमध्ये पुरेसे डॉक्टर्स, पोलीस आणि एसआरपीएफ यंत्रणा आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास ती अजून वाढवून मालेगावमधील कोरोनाचा फैलाव रोखण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. येथील परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील, असे महाराष्टÑाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.जिल्ह्यातील मालेगावमध्ये मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ४४ बाधित रुग्ण आढळून आल्याने सर्व यंत्रणांसह जिल्हादेखील हादरून गेला. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आणि विशेषत्वे मालेगावच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आदी मंत्रीदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना देशमुख यांनी सध्याच्या घडीला मालेगावमध्ये १८०० पोलीस तैनात असून, गरज पडल्यास एसआरपीएफचे सुरक्षा दलदेखील वाढवले जाणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय अतिरिक्त ६० डॉक्टर्सची सेवादेखील मालेगावला दिली आहे. पोलीस, आरोग्य यंत्रणा किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेवर हल्ले झाल्यास शासन ते खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय जे पोलीस फ्रंटलाईनवर काम करतात, त्यांना शासनाच्या वतीने पीपीई किटदेखील देण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्याशिवाय राज्यात कुठेही पोलिसांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख आणि वारसांना नोकरी देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यात सर्वच ठिकाणी प्रशासन यंत्रणा दिवस-रात्र लढत असून, मालेगावमध्ये अधिक पोलीस, डॉक्टरांची गरज लागणार का याचा आढावा घेतला जाणार असून, परिस्थिती लवकर कशी आटोक्यात आणता येईल, त्यावर लक्ष केंदित करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही देशमुख यांनी नमूद केले.--------प्रेमाने न समजल्यास पोलिसी खाक्यानागरिकांना प्रेमाने समजावून सांगण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही जर कुणी ऐकत नसेल तर त्यांना पोलिसी खाक्या कसा दाखवायचा ते पोलिसांना माहिती असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. आतापर्यंत १५६ ठिकाणी ५५० जणांवर हल्ले झाले असून, पोलीस किंवा आरोग्य यंत्रणेवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसल्याचेही ते म्हणाले.--------त्याबाबत मुख्यमंत्री ठरवणारमहाराष्ट्र तसेच मुंबईत परप्रांतीय नागरिक, कामगार जास्त असून, त्यांना त्यांच्या गावाला पाठविण्याची सरकारची इच्छा असून, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल. तसेच त्याबाबत अन्य संबंधित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मगच मुख्यमंत्री त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिक