शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य, सुरक्षेत भर घालणार : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:29 IST

नाशिक : मालेगावमध्ये पुरेसे डॉक्टर्स, पोलीस आणि एसआरपीएफ यंत्रणा आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास ती अजून वाढवून मालेगावमधील कोरोनाचा फैलाव रोखण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. येथील परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील, असे महाराष्टÑाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

नाशिक : मालेगावमध्ये पुरेसे डॉक्टर्स, पोलीस आणि एसआरपीएफ यंत्रणा आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास ती अजून वाढवून मालेगावमधील कोरोनाचा फैलाव रोखण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. येथील परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील, असे महाराष्टÑाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.जिल्ह्यातील मालेगावमध्ये मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ४४ बाधित रुग्ण आढळून आल्याने सर्व यंत्रणांसह जिल्हादेखील हादरून गेला. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आणि विशेषत्वे मालेगावच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आदी मंत्रीदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना देशमुख यांनी सध्याच्या घडीला मालेगावमध्ये १८०० पोलीस तैनात असून, गरज पडल्यास एसआरपीएफचे सुरक्षा दलदेखील वाढवले जाणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय अतिरिक्त ६० डॉक्टर्सची सेवादेखील मालेगावला दिली आहे. पोलीस, आरोग्य यंत्रणा किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेवर हल्ले झाल्यास शासन ते खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय जे पोलीस फ्रंटलाईनवर काम करतात, त्यांना शासनाच्या वतीने पीपीई किटदेखील देण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्याशिवाय राज्यात कुठेही पोलिसांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख आणि वारसांना नोकरी देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यात सर्वच ठिकाणी प्रशासन यंत्रणा दिवस-रात्र लढत असून, मालेगावमध्ये अधिक पोलीस, डॉक्टरांची गरज लागणार का याचा आढावा घेतला जाणार असून, परिस्थिती लवकर कशी आटोक्यात आणता येईल, त्यावर लक्ष केंदित करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही देशमुख यांनी नमूद केले.--------प्रेमाने न समजल्यास पोलिसी खाक्यानागरिकांना प्रेमाने समजावून सांगण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही जर कुणी ऐकत नसेल तर त्यांना पोलिसी खाक्या कसा दाखवायचा ते पोलिसांना माहिती असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. आतापर्यंत १५६ ठिकाणी ५५० जणांवर हल्ले झाले असून, पोलीस किंवा आरोग्य यंत्रणेवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसल्याचेही ते म्हणाले.--------त्याबाबत मुख्यमंत्री ठरवणारमहाराष्ट्र तसेच मुंबईत परप्रांतीय नागरिक, कामगार जास्त असून, त्यांना त्यांच्या गावाला पाठविण्याची सरकारची इच्छा असून, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल. तसेच त्याबाबत अन्य संबंधित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मगच मुख्यमंत्री त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिक