शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

निर्वासितांना आरोग्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 22:44 IST

नाशिक : निवारा केंद्रात असलेले अनेक निर्वासित आपापल्या गावी परतले असले तरी अजूनही केंद्रात आश्रयास असलेल्यांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. अपुरे शौचालय आणि डिस्टन्स नियमांचे पालन करण्याबाबत पुरेशी व्यवस्थाच नसल्याने केंद्रातील निर्वासितांना आरोग्याची काळजी लागली आहे.

नाशिक : निवारा केंद्रात असलेले अनेक निर्वासित आपापल्या गावी परतले असले तरी अजूनही केंद्रात आश्रयास असलेल्यांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. अपुरे शौचालय आणि डिस्टन्स नियमांचे पालन करण्याबाबत पुरेशी व्यवस्थाच नसल्याने केंद्रातील निर्वासितांना आरोग्याची काळजी लागली आहे.जिल्ह्यात २७ निवारा केंद्रांमध्ये जवळपास दोन हजार मजूर, विद्यार्थी आणि कामगार आश्रयाला होते. नाशिकमधून दोन रेल्वे गाड्यांमधून अनेक कामगार रवाना झालेले आहेत. मात्र बरेचसे मजूर अजूनही आश्रयाला आहेत. शहरातील संत गाडगेबाबा धर्मशाळा, पंचम येथील मनपा शाळा, तसेच देवळाली गावातील निर्वासित केंद्राची प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी केली असता या केंद्रांमध्ये अपुऱ्या सुविधा असल्याचे निदर्शनास आले, शिवाय अशा तक्रारीदेखील समोर आल्या आहेत.अपुरी शौचालयेपरिसरात आणि इमारतीमध्ये औषध फवारणी केली जात असली तरी ३० ते ४० व्यक्तींसाठी केवळ दोन ते तीन शौचालये असल्याचे दिसून आले. येथे राहणाºया अनेकांनी नाइलाज असल्याचे सांगून अधिक बोलणे टाळले. करमणुकीसाठी टीव्ही आणि प्रोजेक्टरद्वारे चित्रपट दाखविले जात असले तरी डिस्टन्स नियम राखला जातोच असे नाही. कळत नकळत आपसातील अंतर कमी होत असल्याचे येथील रहिवाशीच सांगतात.जेवणाची वाट बघण्याची वेळगाडगेबाबा धर्मशाळा येथे नगरसेवकांच्या मदतीतून आणि एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र जेवण घेऊन येणारे वाहन वेळेवर येतेच असे नाही. त्यामुळे वाट पहावी लागत असल्याची तक्रार अनेकांनी केली. चहा काही दिवस आला तोही बंद झाला. एकाच ताटात भात, भाजी आणि भाकरी दिली जाते. त्यामुळे भाकरी हातात घेऊन जेवण उरकावे लागते.डिस्टन्स राखणार कसेपंचक आणि देवळाली गावातील केंद्र मनपा शाळांमध्ये आहे. मात्र जाण्या-येण्याचा मार्ग तसेच वºहांड्यात बसल्यामुळे डिस्टन्स नियमांचा भंग होतो. अनेक ठिकाणच्या निवारा केंद्रांतील अवस्था यापेक्षा वेगळी नाही. मोबाइल पाहण्यासाठीदेखील एकत्र आलेल्यांमुळे नियमांचा भंग होतो. स्नानगृहाचा प्रश्नदेखील यापेक्षा वेगळा नाही.

टॅग्स :Nashikनाशिक