शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने दोन वेळचे पुरविले भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:12 IST

गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

ठळक मुद्देगंगाघाटावरील स्थलांतरितांना मदत संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान गंगाघाटावर अनेक बेघर दिवसभर मोलमजुरी व रात्री गंगाघाट हेच त्यांचे घर

पंचवटी : रविवारी सकाळी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली झोपड्या पाल वाहून गेल्याने पुराने भयभीत होऊन कधी झाडाखाली तर कधी भाजीमंडईत सहारा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुराचे पाणी अधिक वाढल्याने उघड्यावर आलेल्या नागरिकांना महापालिका प्रशासनाने तात्पुरते गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याने नदीकाठ परिसरात राहणार्या सर्वच नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका नदीकाठ भागात राहणार्या मोलमजुरी करणार्या नागरिकांना बसला.गाडगे महाराज पुलालगत असलेल्या मरीमाता झोपडपट्टी व अमरधाम नजीक झोपडपट्टीत पुराचे पाणी गेल्याने अनेक नागरिकांची तारांबळ उडाली होती महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांना सुखरूप पणे गणेश वाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले होते.गंगाघाटावर अनेक बेघर राहत असून दिवसभर मोलमजुरी व रात्री गंगाघाट हेच त्यांचे घर अशीच दिनचर्या चालते मात्र रविवारी गोदावरीला आलेल्या पुरानंतर सगळ्यांचीच पळापळ झाली राहायला जागा मिळाली मात्र पोटात अन्नाचा कणही नाही त्यामुळे काय करायचे असा विचार करत असतानाच पंचवटीतील सुनील धुमाळ, मयूर शिंदे, चेतन गरकळ या तिघा तरु णांनी स्वखर्चाने सुमारे 400 ते 500 बेघर झोपडपट्टीत राहणार्या स्थलांतरित नागरिकांना सकाळ सायंकाळ भोजन व्यवस्था करून दिली.रामवाडी परिसरात तळेनगर येथे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने त्यांच्या संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रभागाच्या नगरसेवक श्रीमती भिकुबाई बागुल, माजी नगरसेवक संजय बागुल यांनी सुमारे 300 ते 400 नागरिकांना दुपारी भोजनाची व्यवस्था करत सामाजिक एकतेचे दर्शन घडविले.

 

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलgodavariगोदावरी