शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने दोन वेळचे पुरविले भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:12 IST

गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

ठळक मुद्देगंगाघाटावरील स्थलांतरितांना मदत संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान गंगाघाटावर अनेक बेघर दिवसभर मोलमजुरी व रात्री गंगाघाट हेच त्यांचे घर

पंचवटी : रविवारी सकाळी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली झोपड्या पाल वाहून गेल्याने पुराने भयभीत होऊन कधी झाडाखाली तर कधी भाजीमंडईत सहारा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुराचे पाणी अधिक वाढल्याने उघड्यावर आलेल्या नागरिकांना महापालिका प्रशासनाने तात्पुरते गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याने नदीकाठ परिसरात राहणार्या सर्वच नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका नदीकाठ भागात राहणार्या मोलमजुरी करणार्या नागरिकांना बसला.गाडगे महाराज पुलालगत असलेल्या मरीमाता झोपडपट्टी व अमरधाम नजीक झोपडपट्टीत पुराचे पाणी गेल्याने अनेक नागरिकांची तारांबळ उडाली होती महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांना सुखरूप पणे गणेश वाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले होते.गंगाघाटावर अनेक बेघर राहत असून दिवसभर मोलमजुरी व रात्री गंगाघाट हेच त्यांचे घर अशीच दिनचर्या चालते मात्र रविवारी गोदावरीला आलेल्या पुरानंतर सगळ्यांचीच पळापळ झाली राहायला जागा मिळाली मात्र पोटात अन्नाचा कणही नाही त्यामुळे काय करायचे असा विचार करत असतानाच पंचवटीतील सुनील धुमाळ, मयूर शिंदे, चेतन गरकळ या तिघा तरु णांनी स्वखर्चाने सुमारे 400 ते 500 बेघर झोपडपट्टीत राहणार्या स्थलांतरित नागरिकांना सकाळ सायंकाळ भोजन व्यवस्था करून दिली.रामवाडी परिसरात तळेनगर येथे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने त्यांच्या संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रभागाच्या नगरसेवक श्रीमती भिकुबाई बागुल, माजी नगरसेवक संजय बागुल यांनी सुमारे 300 ते 400 नागरिकांना दुपारी भोजनाची व्यवस्था करत सामाजिक एकतेचे दर्शन घडविले.

 

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलgodavariगोदावरी