शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने दोन वेळचे पुरविले भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:12 IST

गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

ठळक मुद्देगंगाघाटावरील स्थलांतरितांना मदत संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान गंगाघाटावर अनेक बेघर दिवसभर मोलमजुरी व रात्री गंगाघाट हेच त्यांचे घर

पंचवटी : रविवारी सकाळी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली झोपड्या पाल वाहून गेल्याने पुराने भयभीत होऊन कधी झाडाखाली तर कधी भाजीमंडईत सहारा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुराचे पाणी अधिक वाढल्याने उघड्यावर आलेल्या नागरिकांना महापालिका प्रशासनाने तात्पुरते गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याने नदीकाठ परिसरात राहणार्या सर्वच नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका नदीकाठ भागात राहणार्या मोलमजुरी करणार्या नागरिकांना बसला.गाडगे महाराज पुलालगत असलेल्या मरीमाता झोपडपट्टी व अमरधाम नजीक झोपडपट्टीत पुराचे पाणी गेल्याने अनेक नागरिकांची तारांबळ उडाली होती महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांना सुखरूप पणे गणेश वाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले होते.गंगाघाटावर अनेक बेघर राहत असून दिवसभर मोलमजुरी व रात्री गंगाघाट हेच त्यांचे घर अशीच दिनचर्या चालते मात्र रविवारी गोदावरीला आलेल्या पुरानंतर सगळ्यांचीच पळापळ झाली राहायला जागा मिळाली मात्र पोटात अन्नाचा कणही नाही त्यामुळे काय करायचे असा विचार करत असतानाच पंचवटीतील सुनील धुमाळ, मयूर शिंदे, चेतन गरकळ या तिघा तरु णांनी स्वखर्चाने सुमारे 400 ते 500 बेघर झोपडपट्टीत राहणार्या स्थलांतरित नागरिकांना सकाळ सायंकाळ भोजन व्यवस्था करून दिली.रामवाडी परिसरात तळेनगर येथे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने त्यांच्या संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रभागाच्या नगरसेवक श्रीमती भिकुबाई बागुल, माजी नगरसेवक संजय बागुल यांनी सुमारे 300 ते 400 नागरिकांना दुपारी भोजनाची व्यवस्था करत सामाजिक एकतेचे दर्शन घडविले.

 

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलgodavariगोदावरी