शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ शासन निर्णय रद्द करा!

By admin | Updated: September 22, 2015 22:24 IST

संतप्त प्रतिक्रिया : मुख्याध्यापक ठरणार अतिरिक्त

सिन्नर : २८ आॅगस्ट रोजीचा ‘तो’ शासन निर्णय रद्द करा, यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा मुख्याध्यापक संघाने दिला आहे. तुकडी व्यवस्था बंद न करता २५ विद्यार्थी संख्येच्या एका तुकडीला एकापेक्षा जास्त शिक्षक देण्याची व्यवस्था असावी, अतिरिक्त शिक्षक देण्यासाठी वर्गखोलीची अट नसावी, विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांचे ज्यादा पद मंजूर करण्यात यावे, बहुवर्ग अध्यापन पद्धती नसावी, प्रत्येक विषयानुसार शिक्षक भरती करावी, नवीन शाळा सुरू करताना पहिल्या वर्गासाठी ४० ऐवजी ३० विद्यार्थी संख्येचा निकष असावा, नववी व दहावी मध्ये ३० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास ३०च्या पटीने विद्यार्थी संख्येस एक शिक्षक मंजूर करावा, सहावी ते आठवी व नववी ते दहावी या वर्गांसाठी विद्यार्थी संख्येची अट न देता मुख्याध्यापक पद मंजूर करण्यात यावे, आदि मागण्या मुख्याध्यापक संघाने केल्या आहेत.२०१३-१४ मध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे अद्याप समायोजन झालेले नाही, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त झालेल्या कार्यवाहीला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. मूल्यांकन झालेल्या शाळांना अनुदान नाही, अंशदायी पेन्शनयोजना रद्द करून त्या कर्मचाऱ्यांचे नवीन खाते नियमित केले जात नाही, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी उठविली जात नाही, ग्रंथपालांना समान काम समान वेतन मिळत नाही, शिक्षण हक्क कायदा केंद्राप्रमाणे राज्यात जसाच्या तसा लागू केला नाही तोच राज्य शासनाने २८ आॅगस्टचा जाचक शासन निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाने केला आहे. शासनाच्या या निर्णयाचा राज्यातील मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी निषेध केल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाने २८ आॅगस्टचा तो निर्णय रद्द करावा, अन्यथा २९ सप्टेंबरपासून शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांना दिलेल्या निवेदनात मुख्याध्यापक संघाने दिला आहे. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, एस. बी. सिरसाठ, एस. डी. शेलार, गुफरान अन्सारी, राजेंद्र लोंढे, बी. के. शेवाळे, आर. डी. निकम, के. के. आहिरे, एस. के. सावंत, डी. एस. ठाकरे, साहेबराव कुटे, बी. एम. निकम, डी. बी. कुळधर, ए. एम. गावले, आर. जी. सातपुते, एस. व्ही. रत्नाकर, बी. व्ही. पांडे, एन. आर. देवरे, डी. डी. ह्याळीज आदि मुख्याध्यापक उपस्थित होते. (वार्ताहर)