शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

‘तो’ शासन निर्णय रद्द करा!

By admin | Updated: September 22, 2015 22:24 IST

संतप्त प्रतिक्रिया : मुख्याध्यापक ठरणार अतिरिक्त

सिन्नर : २८ आॅगस्ट रोजीचा ‘तो’ शासन निर्णय रद्द करा, यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा मुख्याध्यापक संघाने दिला आहे. तुकडी व्यवस्था बंद न करता २५ विद्यार्थी संख्येच्या एका तुकडीला एकापेक्षा जास्त शिक्षक देण्याची व्यवस्था असावी, अतिरिक्त शिक्षक देण्यासाठी वर्गखोलीची अट नसावी, विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांचे ज्यादा पद मंजूर करण्यात यावे, बहुवर्ग अध्यापन पद्धती नसावी, प्रत्येक विषयानुसार शिक्षक भरती करावी, नवीन शाळा सुरू करताना पहिल्या वर्गासाठी ४० ऐवजी ३० विद्यार्थी संख्येचा निकष असावा, नववी व दहावी मध्ये ३० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास ३०च्या पटीने विद्यार्थी संख्येस एक शिक्षक मंजूर करावा, सहावी ते आठवी व नववी ते दहावी या वर्गांसाठी विद्यार्थी संख्येची अट न देता मुख्याध्यापक पद मंजूर करण्यात यावे, आदि मागण्या मुख्याध्यापक संघाने केल्या आहेत.२०१३-१४ मध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे अद्याप समायोजन झालेले नाही, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त झालेल्या कार्यवाहीला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. मूल्यांकन झालेल्या शाळांना अनुदान नाही, अंशदायी पेन्शनयोजना रद्द करून त्या कर्मचाऱ्यांचे नवीन खाते नियमित केले जात नाही, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी उठविली जात नाही, ग्रंथपालांना समान काम समान वेतन मिळत नाही, शिक्षण हक्क कायदा केंद्राप्रमाणे राज्यात जसाच्या तसा लागू केला नाही तोच राज्य शासनाने २८ आॅगस्टचा जाचक शासन निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाने केला आहे. शासनाच्या या निर्णयाचा राज्यातील मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी निषेध केल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाने २८ आॅगस्टचा तो निर्णय रद्द करावा, अन्यथा २९ सप्टेंबरपासून शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांना दिलेल्या निवेदनात मुख्याध्यापक संघाने दिला आहे. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, एस. बी. सिरसाठ, एस. डी. शेलार, गुफरान अन्सारी, राजेंद्र लोंढे, बी. के. शेवाळे, आर. डी. निकम, के. के. आहिरे, एस. के. सावंत, डी. एस. ठाकरे, साहेबराव कुटे, बी. एम. निकम, डी. बी. कुळधर, ए. एम. गावले, आर. जी. सातपुते, एस. व्ही. रत्नाकर, बी. व्ही. पांडे, एन. आर. देवरे, डी. डी. ह्याळीज आदि मुख्याध्यापक उपस्थित होते. (वार्ताहर)