शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

काका-पुतण्याला मारहाण करून ३२ हजार लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST

----------------------- बंधन फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना साहित्य सिन्नर : भोकणी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त बंधन फाउंडेशन तथा लोकनेते गोपीनाथराव मुंढे ग्रामविकास ...

-----------------------

बंधन फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना साहित्य

सिन्नर : भोकणी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त बंधन फाउंडेशन तथा लोकनेते गोपीनाथराव मुंढे ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे गावातील आदिवासी बांधवांचा सन्मान करण्यात आला. तसेच आदिवासी वस्तीवरील लहान बालकांना शालेय साहित्य, खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच अरुण वाघ, फाउंडेशनचे अध्यक्ष राजू सानप, माजी सरपंच हिरामण भाबड, माजी उपसरपंच शरद सानप, ग्रामपंचायत सदस्य शिवाभाऊ सानप, सदस्य माया सानप, खंडेराव सानप, तात्या पाटील सानप, देवराम दराडे, निवृत्ती रणशेवरे, किसन सांगळे, शांताराम कुऱ्हाडे उपस्थित होते.

---------------------

सिन्नरला रोज ५१ बसद्वारे २९६ फेऱ्या

सिन्नर : कोरोनाच्या महामारीनंतर अनलॉक झाल्यानंतर सिन्नर आगाराच्या ५१ बसद्वारे दररोज २९६ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. ७० टक्के बस पूर्ववत सुरू झाल्या असून टप्प्याटप्प्याने सर्व बस सुरू होणार आहेत. सिन्नर-नाशिक व सिन्नर-ठाणगाव बससेवेला चांगला प्रतिसाद आहे. शिर्डी, नगर, पुणे, मुंबई या लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत. दररोज १८ हजार किलोमीटरचा प्रवास सुरू झाला आहे.

-----------------

कडवा कालव्यास आवर्तन सोडण्यासाठी बैठक

सिन्नर : कडवा कालव्यास आवर्तन सोडण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांची भेट घेऊन चर्चा केली. पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके करपून चालली आहेत. त्यासाठी कडवा कालव्यास आवर्तन सोडणे गरजेचे आहे. धरणात असलेल्या अतिरिक्त पाण्यातून कडवा कालव्यास आवर्तन सोडण्यासाठीचा प्रस्ताव तत्काळ जलसंपदामंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी या वेळी केली.

-----------------

खरिपाची पिके करपू लागली

सिन्नर : या वर्षी पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके करपू लागल्याचे चित्र तालुकाभर पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी सोयाबिन, मका, बाजरीसह अन्य खरिपाची पिके घेतली आहेत. मात्र या वर्षी महिनाभर पाऊस लांबला. त्यानंतर पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.