शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

कहर कायम, चाचण्यांमुळे बाधितांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:43 IST

नाशिक : शहरात कोरोनाचा कहर कायम असून, चाचण्या वाढल्याने बाधितांची संख्यादेखील वाढली आहे. शहरात गेल्या चोवीस तासांत ५१९ बाधित आढळले आहेत, तर ११ जणांचा मृत्यू झाला यात वडाळा, पंचवटी आणि जुन्या नाशिकमधील जास्त बाधितांचा समावेश आहे. दरम्यान, बाधितांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशहरात चोवीस तासांत कोरोनाचे तब्बल ११ बळी५१९ रुग्णांची नोंद।

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात कोरोनाचा कहर कायम असून, चाचण्या वाढल्याने बाधितांची संख्यादेखील वाढली आहे. शहरात गेल्या चोवीस तासांत ५१९ बाधित आढळले आहेत, तर ११ जणांचा मृत्यू झाला यात वडाळा, पंचवटी आणि जुन्या नाशिकमधील जास्त बाधितांचा समावेश आहे. दरम्यान, बाधितांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरात मृत्युदर कमी करण्यासाठी चाचण्या वाढविण्यात आल्या असून, त्यातून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. तथापि, त्याला अद्याप संपूर्ण यश आलेले नाही. शहरात एकूण ११ बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील वडाळा परिसरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात एका ५८ वर्षीय महिलेचा, तर महेबूबनगर येथील ५१ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सारडा सर्कल येथील ७३ वर्षीय वृद्ध तसेच जुन्या नाशिकमधील ६७ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोना संसर्गाने बळी गेला आहे. कानिफनाथनगर येथील हेरंब सोसायटी परिसरात एकाचा मृत्यू झाला आहे. पंचवटीत अमृतधाम परिसरातील बिडी कामगार सोसायटी येथील ६९ वर्षीय पुरुष तसेच पंचवटीतील ४७ वर्षीय पुरुष, दिंडोरीरोडवरील गुलमोहोर कॉलनीतील ४२ वर्षीय पुरुष रुग्ण आणि दिंडोरीरोडवरील शिवनगर येथील ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. सिडकोतील ६५ वर्षीय रुग्णाचा, तर देवळालीगाव येथील हरिधाम परिसरातील ६५ वृद्ध पुरुषाचा कोरोनामुळे संसर्गामुळे मृत्यू झाला. या अकरा बळींमुळे २४५ कोरोबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदराचे आॅडिट होणारशहरात सातत्याने प्रयत्न करूनदेखील मृत्युदर कमी होत नसल्याने आता मृत्युदराचेच आॅडिट करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे. यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सदरचा मृत रुग्ण प्रतिबंधित क्षेत्रातील होता काय, रुग्ण हाय रिस्क की लो रिस्क, रुग्णास कधीपासून त्रास सुरू झाला, रुग्णाने कोणत्या रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले, चाचणी पॉझिटिव्ह कधी आली, त्यांनतर उपचार कुठे घेतले आणि रुग्णाला अन्य काही आजार होते काय याबाबत हे आॅडिट असेल. यापूर्वी डेथ आॅडिटदेखील महापालिकेने केले आहे. शहरात बाधितांची संख्यादेखील वाढली आहे. शहरात महापालिकेच्या वतीने दाट वस्त्यांमध्ये कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. तसेच नगरसेवक आणि राजकीय पक्षांनी तसेच सेवाभावी संस्थेच्या वतीनेदेखील चाचण्या वाढविण्यात आल्याने बाधितांच्या संख्येत वाढ अपेक्षित होते. त्यामुळे ५१९ बाधित वाढले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ७ हजार ५०५ इतकी संख्या झाली आहे. अर्थात, यातील ५ हजार ४४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य