नाशिक : गतकाळातील कबड्डीचा सुवर्णकाळ पुन्हा येण्यासाठी खेळाडू आणि क्रीडा संस्थांनी कठोर मेहनत घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह प्रकाश बोराडे यांनी केले. श्ािंदे येथे नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व राजाभाऊ तुंगार व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कबड्डी दिनानिमित्त जिल्हा कबड्डी पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनमाडच्या आझाद नवजीवन क्रीडा मंडळाचे निवृत्ती शिंपी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संजय तुंगार, राज्य नेटबॉल संघटनेचे सचिव संजय पाटील, सरपंच उज्ज्वला जाधव, जिल्हा संघटनेचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, बाळासाहेब जाधव, रंगनाथ शिंदे, बाजीराव जाधव, प्रा. दत्ता शिंपी, राजेंद्र निकुंभ आदि उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन प्रशांत भाबड यांनी केले. यावेळी शरद पाटील, विलास पाटील, दत्ता जाधव, रहेमान शेख, कीर्ती पाटील, कविता मोहिते, सुनील शिंपी आदि उपस्थित होते.