शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सुमधुर पाऊस गीतांनी  रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:33 IST

आल्हाददायक सायंकाळ, पाऊस गीतांचे सुमधुर गायन, त्याला तितक्याच लयबद्धतेने मिळत असलेली संगीतसाथ, टाळ्यांच्या कडकडाटासह श्रोत्यांचा प्रतिसाद या साऱ्यांमुळे वातावरण भारावून गेले होते. निमित्त होते ‘पाऊस गीत’ कार्यक्रमाचे.

नाशिक : आल्हाददायक सायंकाळ, पाऊस गीतांचे सुमधुर गायन, त्याला तितक्याच लयबद्धतेने मिळत असलेली संगीतसाथ, टाळ्यांच्या कडकडाटासह श्रोत्यांचा प्रतिसाद या साऱ्यांमुळे वातावरण भारावून गेले होते. निमित्त होते ‘पाऊस गीत’ कार्यक्रमाचे. कापडबाजारातील व्यंकटेश बालाजी मंदिरात वेणूनादच्या वतीने ही मैफल पार पडली.  मिलिंद गांधी यांच्या पाऊस गीतांना बासरीवादक मोहन उपासनी यांनी स्वरबद्ध करून रसिकांना एक वेगळीच अनुभूती दिली. ‘विठ्ठलारे पांडुरंगा ऐक माझे सांगणे’ या अभंगातून गायक ज्ञानेश्वर कासार याने सद्यपरिस्थितीत ओढ घेतलेल्या पावसाला पुन्हा बरसायला लाव ही आर्त हाक घातली. ‘अंग माझे चांदण्याने भिजवले तू’ या गीतातून गायिका स्वागता पोतनीस यांनी रसिकांना डोलायला लावले. तबला साथ सतीश पेंडसे, आॅक्टोपॅड अभिजित शर्मा, की-बोर्ड अनिल धुमाळ, ध्वनी पराग जोशी यांनी तेवढ्याच ताकदीची साथसंगत केली. प्रास्ताविक वैशाली बालाजीवाले यांनी केले. यावेळी हरीश बालाजीवाले, नगरसेवक शाहू खैरे, मोनालिसा दिवेकर, किशोर पाठक, सि. ल. कुलकर्णी आदी उपस्थित होते.शब्दसुरांची बरसात‘सरला जरी मनाने ऋतू आज पावसाचा’ या गीताला गायक पुष्कराज भागवत याने बहार आणली. ‘ये खुशाल सजवाया देहाच्या सोहळ्यास’, ‘पावसाला ही तसे हे चांदणे सलतेच आहे ’, ‘तुझा माझ्या देहावर माळूनिया रंग’, ‘मी पेटवले मन माझे पाऊस बरसला जेव्हा’, ‘जागा कुणा दिलाची देऊ नकोस राजा’ अशा एकापेक्षा एक सुंदर पाऊसगीतांनी रसिकांना शब्दसुरांच्या बरसातीने अक्षरश: चिंब भिजवले पुष्कराज भागवत यांनीही सुमधुर गिते सादर केली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक