शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

उद्योगात यशप्राप्तीसाठी आत्मविश्वासाची गरज हनुमंत गायकवाड : विवेक युवा विचार सप्ताहात उद्योग व्यवसायाविषयी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:27 IST

नाशिक : भारतीय उद्योगांचे जागतिकीकरण करून जागतिक स्तरावर भारतीय तरुणांना उद्योग व्यवसायासाठी पाठबळ उभे करण्याच्या उद्देशाने सरकारकडून जागतिक उद्योग धोरण अस्तित्वात येणार आहे.

ठळक मुद्देजागतिक उद्योग धोरण अस्तित्वात येणार आत्मविश्वास जागृत ठेवण्याची गरज

नाशिक : भारतीय उद्योगांचे जागतिकीकरण करून जागतिक स्तरावर भारतीय तरुणांना उद्योग व्यवसायासाठी पाठबळ उभे करण्याच्या उद्देशाने सरकारकडून जागतिक उद्योग धोरण अस्तित्वात येणार आहे. त्या माध्यमातून येथील तरुणांना उद्योग व्यवसायाच्या प्रचंड संधी निर्माण होणार असून, उद्योग व्यवसायात योग्य संधी ओळखून यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने आपल्यातील अंतर्गत प्रामाणिकता आणि आत्मविश्वास जागृत ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक हनुमंत गायकवाड यांनी केले. नाशिक विवेक वाहिनीतर्फे मराठा विद्या प्रसारक समाजाच्या इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर येथे राष्ट्रीय युवा दिन तथा स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित विवेक विचार सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ‘स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत : संधी आणि आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर कृषी उद्योजक विलास शिंदे, पीयूष सोमाणी, डॉ. सुनील ढिकले, सचिन पिंगळे, कोंडाजी आव्हाड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश नखाते यांनी, तर सूत्रसंचालन पल्लवी चिंचवडे यांनी केले. गायकवाड म्हणाले, भारत विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरुवात केलेल्या कामाला आज भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचविण्यात यश प्राप्त झाले, त्यामागे या समूहात काम करणाºया सर्वांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आगामी काळात भारत विकासाचीच कल्पना घेऊन हाउसकीपिंगसोबत आरोग्य, संरक्षण, कृषी क्षेत्रात भारत विकास ग्रुपचे काम आमूलाग्र बदल घडविणारे ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत विकासाची संकल्पना आणि सतत झुंजण्याची तयारी ठेवून सातत्याने काम केल्यामुळे आतापर्यंत यश संपादन करणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे तरुण पिढीतील तरुणांनी त्यांच्या संकल्पना निश्चित करून आत्मविश्वासाने यशप्राप्तीसाठी झुंजण्याची तयारी करण्याची गरज आहे. अपयशाने अथवा अन्याय, अपमानाने खचून न जाता कोणत्याही समस्येवर आत्मविश्वासाने काम करण्याच्या विचाराने मात करता येणे शक्य असल्याचे सांगत त्यांनी तरुणांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात उद्योग व्यवसाय करण्याचा सल्ला दिला.‘इतरांना दोष देण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करा’यंत्रणेत अनेक दोष असतात. त्यांचा अनेकदा अडसरही निर्माण होतो; परंतु प्रामाणिकता आणि आत्मविश्वासाने ध्येयाकडे वाटचाल केली तर यशप्राप्ती निश्चित मिळते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी इतरांनी काय केले अथवा इतरांमुळे आपले काम होऊ शकले नाही असे म्हणून इतरांना दोष देण्यापेक्षा तरुणांनी स्वत:ला सिद्ध करण्याची गरज असल्याचे मत हनुमंत गायकवाड यांनी विवेक विचार सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.