शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

संतप्त महिलांचा घोरवड ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:21 IST

सिन्नर तालुक्यातील घोरवड येथे गेल्या महिन्याभरापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घोरवडसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडीत करण्यात आला असून गावातील सार्वजनिक विहिरीने तळ गाठल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून रोष व्यक्त केला.

बोरखिंड धरणातून घोरवडसह पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. सदर योजना महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या ताब्यात आहे. या योजनेचे अद्याप हस्तांतर झाले नाही. जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने गेल्यावर्षी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या निधीतून अपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली. मात्र वीज थकबाकीमुळे गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात योजनेचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. त्यानंतर गावातील सार्वजनिक विहिरीतील पाण्यावर नळपाणीपुरवठा योजना सुरु ठेवण्यात आली होती. मात्र आता सार्वजनिक विहिर आटल्याने ग्रामस्थांना घोरवडसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेची गरज निर्माण झाली आहे. पूर्ण थकबाकी भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करण्यास वीज वितरण कंपनी तयार नाही. योजना मजीप्राच्या ताब्यात असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून योजना आमच्या ताब्यात नसल्याचे सांगते. यातील गावे या योजनेचे हंगामी म्हणजे उन्हाळ्यात पाणी वापरते. आता सार्वजनिक विहिंर आटल्याने टंचाई निर्माण झाली आहे. घोरवड गावातील नळ पाणी योजना सुमारे २० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून रोष व्यक्त केला. यावेळी सविता हगवणे, चंद्रभागा लोहकरे, सुमन हगवणे, लक्ष्मी लोहकरे, पुष्पा हगवणे, कल्याबाई लहामटे, सत्यभामा हगवणे, शांताबाई तळपे, मंदा हगवणे, शारदा हगवणे, यमुना हगवणे, कमलाबाई भुजबळ, संगिता मंडलिक, सुमन लहामटे, पूजा सोनुसे, सविता लहामटे, यशोदा म्हसाळ, पार्वताबाई बामणे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater shortageपाणीटंचाई