शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

पावणेसहाशे धार्मिक स्थळांवर पडणार हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:56 IST

नाशिक : शहरातील बेकायदा धार्मिकस्थळे हटविण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू होणार असून, ५७४ धार्मिकस्थळांवर हातोडा चालवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत पोलीस बंदोबस्त देण्याची अधिकृत तारीख कळविल्यानंतरच ही मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले.

ठळक मुद्देमहापालिकेत बैठक : पोलीस बंदोबस्ताची प्रतीक्षा

 

 

नाशिक : शहरातील बेकायदा धार्मिकस्थळे हटविण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू होणार असून, ५७४ धार्मिकस्थळांवर हातोडा चालवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत पोलीस बंदोबस्त देण्याची अधिकृत तारीख कळविल्यानंतरच ही मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले.दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेची सुनावणी करताना राज्यातील सर्व बेकायदा धार्मिकस्थळे हटविण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने काही प्रमाणात कार्यवाही करण्यात आली होती. तथापि, आता पुन्हा न्यायालयाने राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना १३ आॅगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार त्यामुळे आता पुन्हा एकदा बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याची माहिती मोहीम राबविण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.७) यासंदर्भात महापालिकेचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी बैठक घेतली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सहायक पोलीस आयुक्त शांताराम गायकवाड, म्हाडाचे प्रादेशिक अधिकारी रमेश मिसाळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयाने बंदोबस्त दिल्याशिवाय मोहीम राबविता येणार नसल्याने पोलीस बंदोबस्त कधी मिळणार याबाबत माहिती द्यावी, असे ठरविण्यात आले. सर्वाधिक बेकायदा धार्मिक स्थळे राज्यातील अन्य ठिकाणांच्या तुलनेत नाशिकमध्ये सर्वाधिक बेकायदा धार्मिक स्थळे असून, त्यामुळेच अशाप्रकारची स्थळे काढण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. यापूर्वी नाशिक शहरात अपवादात्मक दोन ते तीन ठिकाणी निर्माण झालेला तणाव वगळता शांततेत कारवाई झाली आहे. त्यामुळे आताही अशाचप्रकारे कार्यवाही करण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत आहे. यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार २००९ पूर्वीची शहरात ९०८ बेकायदा धार्मिक स्थळे असून, त्यातील २४९ धार्मिक स्थळे नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित ६५९ धार्मिक स्थळांपैकी १५६ हटविण्यात आललो असून, ५०३ शिल्लक आहेत.२००९ नंतर झालेल्या धार्मिक स्थळांची संख्या १७६ असून, त्यापैकी १०५ काढण्यात आले. आता ७१ शिल्लक आहेत. अशाप्रकारे एकूण ५७४ धार्मिक स्थळे हटविणे बाकी असून, त्यासाठी आता तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय वातावरण तप्त सध्या सणासुदीचे दिवस असून, राजकीय वातावरण तप्त आहे. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन तणाव होणार नाही, अशा पद्धतीने पोलीस यंत्रणा बंदोबस्त देणार असल्याचे वृत्त आहे.