शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

निम्मे साधुग्राम रिकामे

By admin | Updated: September 19, 2015 23:03 IST

साधू परतले : आखाडे-खालशांत शुकशुकाट; मंडप ओस

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून रात्रंदिवस जागे असलेले, साधूंच्या वास्तव्याने गजबजून गेलेले आणि भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे तपोवनातील साधुग्राम कुंभमेळ्याची तिसरी पर्वणी आटोपताच जवळपास निम्म्याहून अधिक रिकामे झाले. उर्वरित खालशांतही पूर्णत: शुकशुकाट असून, साधू-महंत परतीच्या तयारीत व्यस्त आहेत. येत्या दोन दिवसांत साधुग्राम पूर्णत: रिकामे होण्याची चिन्हे आहेत. कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने तपोवनातील साडेतीनशे एकर जागेत साधुग्राम उभारले. तेथे स्वच्छतागृहे, शौचालये, पाणी, विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. साधारणत: जुलै महिन्यापासून साधुग्राममध्ये देशभरातील साधू-महंतांचा ओघ सुरू झाला. १४ जुलै रोजी पुरोहित संघाचे ध्वजारोहण झाल्यानंतर कुंभमेळ्याचे नगारे वाजू लागले आणि आॅगस्टमध्ये साधुग्राम खऱ्या अर्थाने फुलले. देशभरातील साधू-महंतांना पाहण्यासाठी, त्यांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचे पाय साधुग्रामकडे वळू लागले. त्यामुळे रविवार व अन्य सुटीच्या दिवशी या भागात पाय ठेवायलाही जागा उरत नव्हती. दरम्यान, कुंभमेळ्याच्या प्रथम दोन पर्वण्या झाल्यानंतर मात्र साधुग्राममध्ये भाविकांचा ओघ घटू लागला. बरेच साधूही आपल्या मूळ ठिकाणी परतले. शुक्रवारी तिसरी पर्वणी झाल्यानंतर तर सायंकाळीच अनेक साधूंनी साधुग्राममधील मुक्काम हलवला. काहींनी मात्र पावसामुळे थांबून घेतले आणि साहित्याची आवराआवर, बांधाबांध करीत शनिवारी सकाळी परतीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. साधुग्राममध्ये सकाळपासूनच वाहने भरण्याचे, मंडप सोडण्याचे, कमानी उतरवण्याचे काम ठिकठिकाणी सुरू होते. खालशातील भांडी, पलंग, गॅस आदि वस्तूंसह किराणा मालाची पोती, अगदी दुचाकी वाहनेही ट्रक, टेम्पोमध्ये भरली जात होती. भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे डोक्यावर गाठोडी घेऊन साधुग्रामबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत होते. एरवी भजन-कीर्तनाने दुमदुमून जाणाऱ्या साधुग्राममध्ये आज शांतता होती. काही तुरळक ठिकाणी प्रवचने सुरू होती; मात्र तेथे भाविकांची संख्या फार नव्हती. दरम्यान, काही मोठ्या खालशांमध्ये युद्धपातळीवर आवरासावर सुरू असून, उद्या मोठ्या प्रमाणात साधू रवाना होणार आहेत. पुढील दोन दिवसांत संपूर्णत: रिकामे होण्याचा अंदाज साधूंनी व्यक्त केला आहे. भेटू उज्जैनला!गेल्या दोन महिन्यांपासून कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला एकत्र आलेल्या साधूंनी आता येत्या एप्रिलमध्ये होणाऱ्या उज्जैनच्या कुंभमेळ्यात पुन्हा भेटण्याची ग्वाही देत एकमेकांचा निरोप घेतला. उज्जैनला येत्या एप्रिल व मेमध्ये कुंभमेळा होणार असून, तत्पूर्वी डिसेंबर-जानेवारी अलाहाबादला माघ मेळाही भरणार आहे. साधूंना आता या दोन मेळ्यांचे वेध लागले आहेत.पावसामुळे तारांबळपरतीचे वेध लागलेले साधू-महंत शनिवारी आवरासावर करीत असतानाच, सायंकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. बहुतांश खालशांचे मंडप सोडल्याने साधूंचे साहित्य उघड्यावरच होते. ते आडोशाला हलवताना साधूंची धावपळ झाली. तर पाऊस आणखी वाढण्यापूर्वीच काहींनी घाई करीत साधुग्राम सोडले. आखाड्यांत शांततासाधुग्रामचे मुख्य केंद्र असलेल्या तिन्ही अनी आखाड्यांमध्येही आज शांतताच होती. त्यांतील बहुतांश साधू गावी परतल्याने मंडप रिकामेच होते, तर काही ठिकाणी वाहने भरण्याची लगबग सुरू होती. आखाड्यांच्या प्रमुख महंतांनी मात्र आज आराम करणेच पसंत केले.गर्दी घटलीएरवीच्या शनिवार-रविवारी भाविकांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या साधुग्राममध्ये आज मात्र शनिवार असूनही वर्दळ कमीच होती. मुख्य रस्त्याच्या बाजूला बसलेल्या विक्रेत्यांमुळे काहीशी वर्दळ जाणवत होती; मात्र भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात घटला होता. देणे-घेणे पूर्णसाधू-महंतांतील हिशेब, आर्थिक देणे-घेणे शुक्रवारी रात्रीच पूर्ण करण्यात आले. सकाळी तिसरे शाहीस्नान करून साधुग्राममध्ये आल्यावरच साधू-महंतांनी व्यवहार पूर्ण केले. कुंभमेळा संपल्यावर आखाडे-खालशांमध्ये ‘बिदाई’ देण्याची प्रक्रियाही रात्रीच पूर्ण झाल्याचे काही साधूंनी सांगितले.