शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 1:15 AM

सायखेडा : संततधार पाऊस व धरण क्षेत्रातून पाण्याच्या विसर्गामुळे सायखेडा परिसरात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : संततधार पाऊस व धरण क्षेत्रातून पाण्याच्या विसर्गामुळे सायखेडा परिसरात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आता पंचनामा कधी होतो याची वाट पाहत आहे. सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चापडगाव आदी गावांतील शेतांमध्ये अद्यापही पाणी साचलेले आहे. त्यामुळे पूर ओसरला तरी पुराच्या पाऊलखुणा अद्यापही आहेत. शेतातील भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. नदीलगत असलेल्या वीटभट्टीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. सायखेडा व चांदोरी परिसरातील पूरस्थिती आज पाणी ओसरल्याने पूर्व पदावर आली आहे.  यावेळी प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे पूरस्थिती गंभीर झाली नसली तरी पुरामुळे शेतकरीवर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. योग्य वेळी नांदूरमधमेश्वर  धरणातून पाण्याचा विसर्ग होत राहिल्याने मोठ्या पुराचा धोका टळला. अन्यथा गोदाकाठ पूर्ण जलमय झाला असता; मात्र शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सायखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.  पानवेली नदीबाहेर काढल्या जात होत्या. पण काम अतिशय संथ गतीने सुरू होते. पूर आला असता पाटबंधारे खात्याला जाग आली आणि रात्री जेसीबीच्या  साह्याने पानवेली काढण्याची कसरत करावी लागली. पानवेलींमुळे सायखेडा पुलाला धोका निर्माण होतो हे माहीत असतानाही पाटबंधारे खाते वेळकाढूपणा का करते, असा  सवाल उपस्थित होत आहे. सकाळपासून पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.