शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बागलाणमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:14 IST

बागलाण तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून गारपीट आणि आवकाळी पावसाने थैमान घातले आहे. आज मंगळवारी सायंकाळी केरसाणे, दसाणे, मुंगसे, पिंगळवाडे, ...

बागलाण तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून गारपीट आणि आवकाळी पावसाने थैमान घातले आहे. आज मंगळवारी सायंकाळी केरसाणे, दसाणे, मुंगसे, पिंगळवाडे, अंतापूर, मुल्हेर परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. तब्बल आठ मिनिटे झालेल्या गारपीटमुळे कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो व भाजीपाला पीक अक्षरशः भुईसपाट झाले. काढणीवर आलेले गहू, हरभरा, भाजीपाला पिकाची अक्षरशः माती झाली असून हाता तोंडाशी आलेला घास या आस्मानी संकटाने हिरावून नेला. गेल्या रविवारी, सोमवारी जायखेडा, ब्राम्हणपाडे, आसखेडा, भडाने, पिंपळकोठे, अंतापूर, मुल्हेर, जामोटी, अलियाबाद, तळवाडे दिगर, पठावे दिगर, मोरकुरे, किकवारी आदी परिसराला पावसाने झोडपले असून एकूण बारा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली आहे.

गारपीट सारख्या नैसर्गिक संकट काळात नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याआहे. लवकरच संपूर्ण पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला सादर करून भरीव भरपाईची मागणी करणार आहोत.

-आमदार दिलीप बोरसे, बागलाण