शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

गारपीट : अनेक तालुक्यात जनावरे, शेळ्या, कोंबड्या दगावल्या; काही ठिकाणी बोगस पंचनामे

By admin | Updated: March 16, 2015 00:41 IST

आभाळच फाटले ठिगळ लावणार कसे?

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी अचानक आलेल्या या अस्मानी संकटाने झालेले नुकसान हे लाखो रुपयांचे असून, शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे. जणूकाही आभाळच फाटले तर ठिगळ कुठे लावणार असा प्रश्न आहे. चांदवड : तालुक्यात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या गारपिटीने लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, शासकीय पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक पंचनामे करीत असून, या गारपिटीने तालुक्यातील जोपूळ येथील पोपट रेवजी वाघ यांच्या शेतात वीज पडून एक बैल ठार झाला, तर वडबारे येथील शंकर भिका जाधव यांच्या शेतात गारपिटीमुळे गुदमरून दोन शेळ्या, जोपूळ येथे २ शेळ्या, नांदूरटेक येथील रामनाथ देवराम शिंदे यांच्या दोन गायी गुदमरून मृत झाल्यात, तर मंगरूळ येथील बबन दामू जाधव यांच्या ४०० कोबंड्या, गणूर येथील सयाजी जाधव यांच्या ४५० कोंबड्या, हिरापूर येथील २०० कोंबड्या गारपीटीमुळे मृत पावल्या तर गुऱ्हाळे येथील विठ्ठल महादेव भवर यांच्या ३०० कोंबड्या मृत पावल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख , कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली. चांदवड तालुक्यात शुक्रवार दि. १३ रोजी शिवरे , बोराळे व परिसरात अवकाळी पावसानेमुळे शेती व फळपिकांचे नुकसान झाले. यावेळी एकूण १३ गावात गारपिट झाली त्यात गावनिहाय झालेला पाऊस चांदवड २.८ मिमी , दिघवद १ मिमी, रायपूर ३ मिमी, वडनेरभैरव १,७० मिमी, दुगाव २५मिमी, वडाळीभोई२.०५ मिमी तर चांदवडला सरासरी ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर द्राक्ष पिकाचे ७४० शेतकऱ्यांचे ३६० हेक्टर क्षेत्र, कांदा पिकाचे ३१० शेतकऱ्यांचे २१० हेक्टर क्षेत्र, हरभरा पिकाचे १८० शेतकऱ्यांचे ९० हेक्टर क्षेत्र, गहु पिकाचे ४५५ शेतकऱ्यांचे २०० हेक्टर क्षेत्र असे एकूण १६८५ शेतकऱ्यांचे ८६० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची पाहणी मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल अहेर, यांच्या समवेत प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख, गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी शिवरे, बोराळे, बहादुरी, जांबुटके व परिसरात केली . शनिवार दि. १४ मार्च रोजी चांदवड व परिसरात ३८ गावात गारपीट व अवकाळी पावसामुळे घरे , जनावरे, शेती, फळपीकांची नुकसान झाले. तालुक्यातील मंडल निहाय झालेला पाऊस चांदवड १८.२ मिमी, दिघवद २ मिमी, रायपूर ९ मिमी, वडनेरभैरव ० मिमी, दुगाव १५ मिमी, वडाळीभोई २.८० मिमी तर चांदवडला सरासरी ७.८३ मिमी पाऊस झाला आहे. चांदवड तालुक्यात पडलेल्या गारपीटीमुळे एकूण १२ गावात ६२६ अंशत: नुकसान झाले ओ. तर द्राक्ष ६२७ शेतकऱ्यांचे ३५० हेक्टर, कांदा ३७२५ शेतकऱ्यांचे १५४४ हेक्टर, हरभरा १६५९ शेतकऱ्यांचे ५४६.५ , गहु २०२३ शेतकऱ्याचे ७६९ हेक्टर, कांदा डोंगळे ६२३० शेतकऱ्यांचे ४६७.५० हेक्टर, डाळींब ३२३ शेतकऱ्यांचे ६२७ हेक्टर, भाजीपाला ७८८ शेतकऱ्यांचे ३८१.५० हेक्टर , इतर ७ शेतकऱ्यांचे ७.६० हेक्टर असे एकूण १५३८२ शेतकऱ्यांचे ४६९३.१० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी वडबारे येथे रात्री उशीरा भेट देऊन मृत्यू पावलेल्या शेळ्या गायी, जनावरांची पाहणी केली. व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आवाहन केले आहे. जोरण येथे केले बोगस पंचनामेजोरण- बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात बोगस पंचनामे केले. शासनने निधि दिला पण वेविस्थत खातेदारांना वाटप केले नाही जोरण तलाठी कार्यालयात एकूण 155 खातेदारांना लाभ मिळालेला नाही तर तलाठी व कोतवाल यांनी एकञीत येवून जोरण ,निकवेल , विंचुरे , कपालेश्वर, देवपूर, आदी गावांचा समावेश आहे बोगस पंचनामे करु न शासनाकडे पाठवले पंचनामानुसार खातेदारांची वर्गवारी केली.ऐन दुष्काळाच्या काळात शेतकर्याला मदत निधी दिला पण त्याच्यात बळिराजाचा खर्च सुध्दा निघाला नाही असा बोगस कारभारामुळे जोरण परिसरातील शेतकर्यांनी संताप वेक्त केला आहे अशा या बोगस कारभारामुळे १५५ खातेदार दुखावले या खाते दारांनी त्ांलाठी व कोतवाल यांना सांगितले तर त्याच्या कडून उत्तर असे मिळाले की, आम्ही रजेवर आहेत तर वंचित बळीराजा जानार कुठे पंचनामाच्यावेळी खातेदाराची किंमत केली नाही अशा ह्या बोगस कारभाराला कोतवाल व तलाठी जबाबदार आहे. लासलगाव : वनसगाव सारोळे खुर्द शिवडी, ब्राम्हणगाव वनस येथील काही शेतांमध्ये प्रचंड प्र२माणात गारपीटीने गारांचा थर साचुन हिरव्या गार शेतीऐवजी बर्फाच्छदीत शेती दिसत होती. लासलगाव तसेच निमगाव वाकडा येथेही सुमारे अर्धा तास गारपीटीने झोडपले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत झाले नाही इतके प्रचंड नुकसान झाले आहेउगावला गारपीटी सह वादळी अवकाळी पावसाने सुपारीच्या आकाराएवढ्या गारपीटीने व वादळी वारे पावसामुळे सर्व हजारो एकर द्राक्ष बागावरील द्राक्ष घड खाली पडले थर द्राक्ष बागांच्या पाणांची जोरदार पाणगळ झाली आहे.(लोकमत चमू)