शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भगूर, कॅम्प भागातूून दारणात गटारीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:27 IST

भगूर नगरपालिका व देवळाली कॅम्प छावणी परिषदेच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी दारणा नदीपात्रात मिसळले जात असल्याने नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

भगूर : भगूर नगरपालिका व देवळाली कॅम्प छावणी परिषदेच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी दारणा नदीपात्रात मिसळले जात असल्याने नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.भगूरमधील नरशा ओहळ, राम मंदिररोड, राजवाडा, देवळाली कॅम्प छावणी परिषद हद्दीतील सैनिक सोसायटी, अमित श्रीमंत रो-हाउस, शहा सोसायटी, पंचदीप सोसायटी, एमईएस सोसायटी, विजयनगर, दोनवाडेरोड आदी ठिकाणच्या नाले, गटारी यातून दुर्गंधीयुक्त घाण पाणी दारणा नदीपात्रात जाऊन मिसळत आहे. याकडे भगूर नगरपालिका व छावणी परिषदेकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नदीपात्रातील मासे व इतर जलचर प्राण्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रातून जलशुद्धीकरण केंद्रात येणारे पाणी हे योग्य पद्धतीने शुद्धीकरण केले जात नसल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. यामुळे संसर्गजन्य रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. दारणा नदीपात्रात भगूर व देवळाली कॅम्प भागातून मोठ्या प्रमाणात गटारी, नाल्याचे सांडपाणी मिसळत असल्याने नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. याकडे प्रदूषण नियामक मंडळाने गांभीर्याने लक्ष देऊन नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी कठोर कारवाई करून उपाययोजनेच्या सूचना कराव्या, अशी मागणी केली जात आहे.