शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

गुरु नानकजींची ५५०वी जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:49 IST

श्री गुरुनानक देवजी सेवाच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडले.

नाशिक : श्री गुरुनानक देवजी सेवाच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडले. कीर्तन,भजन, प्रवचन आणि श्री गुरु ग्रंथ साहिबच्या पठणाच्या अखंड पाठचीही सांगता झाल्यानंतर लंगरसह प्रसादाचे वितरण करण्यात आले.शहरातील शीख बांधवांकडून भक्तिमय वातावरणात फेरीच्या आयोजनासह अखंड पाठ, शबद कीर्तन तसेच लंगरचे आयोजन करण्यात आले होते. गुरुद्वारांच्या वतीने विविध व्यवस्थापन समित्यांनी उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यासाठी गुरुद्वारांमध्ये देशाच्या अन्य भागांमधून कीर्तनी जथ्थे दाखल झाले होते. तसेच विविध कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रभात फेरी, अखंड पाठ, कीर्तन आदींचे आयोजन करण्यात आले होते. आठवडाभरापासून दररोज शहरातील देवळाली कॅम्प, नाशिकरोड, शिंगाडा तलाव,पंचवटी, हिरावाडी येथील गुरुद्वारांनी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुनानक जयंतीनिमित्त महानगरातील हजारो शिखबांधव महानगरातील गुरुद्वारांमध्ये सहभागी झाले होते. तसेच गुरुद्वारांना रोषणाईने सजविण्यात आले आहे. शिंगाडा तलावच्या गुरुद्वारामध्ये तर गुरुद्वाराच्या बाहेरदेखील भव्य स्क्रीन लावून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय रक्तदान शिबिर, दंतचिकित्सा कॅम्प, मॅमोग्राफी शिबिर यांसह विविध सामाजिक उपक्रमदेखील वर्षभरात आयोजित करण्यात आले होते. शिंगाडा तलाव येथील गुरुद्वारात ओमवीर सिंग, प्रभलीन कौर आणि जगदीपसिंग या कीर्तनी जथ्थ्याने विविध भजने आणि कीर्तने सादर करीत सेवा अर्पण केली.प्रदूषणविरहित उत्सववायु हा गुरू, पाणी हा पिता आणि धरती ही आई असल्याचे आपली संस्कृती सांगते. त्यामुळे या तिघांची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही, अशाच प्रकारे उत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय सर्व गुरुद्वारा प्रबंधक समित्यांनी घेतला होता. त्यानुसार स्वच्छतेवर भर देत फटाक्यांविना आणि प्रदूषणविरहित उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.श्री गुरु नानकजी यांच्या जयंतीनिमित्त शीख धर्मीयांचा सर्वोच्च पवित्र ग्रंथ मानल्या जाणाऱ्या गुरु ग्रंथ साहिबच्या पठणाला तीन दिवसांपूर्वीच प्रारंभ करण्यात आला होता. तीन दिवस त्याचे पठण झाल्यानंतर मंगळवारी सकाळी या पाठाची समाप्ती करण्यात आली. या ग्रंथामध्ये श्री गुरु नानकजी यांच्या वचनांचा अंतर्भाव आहे. पठणाचा समारोप झाल्यानंतर आरती करुन अखंड पाठाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक