शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

गुरु नानकजींची ५५०वी जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:49 IST

श्री गुरुनानक देवजी सेवाच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडले.

नाशिक : श्री गुरुनानक देवजी सेवाच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडले. कीर्तन,भजन, प्रवचन आणि श्री गुरु ग्रंथ साहिबच्या पठणाच्या अखंड पाठचीही सांगता झाल्यानंतर लंगरसह प्रसादाचे वितरण करण्यात आले.शहरातील शीख बांधवांकडून भक्तिमय वातावरणात फेरीच्या आयोजनासह अखंड पाठ, शबद कीर्तन तसेच लंगरचे आयोजन करण्यात आले होते. गुरुद्वारांच्या वतीने विविध व्यवस्थापन समित्यांनी उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यासाठी गुरुद्वारांमध्ये देशाच्या अन्य भागांमधून कीर्तनी जथ्थे दाखल झाले होते. तसेच विविध कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रभात फेरी, अखंड पाठ, कीर्तन आदींचे आयोजन करण्यात आले होते. आठवडाभरापासून दररोज शहरातील देवळाली कॅम्प, नाशिकरोड, शिंगाडा तलाव,पंचवटी, हिरावाडी येथील गुरुद्वारांनी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुनानक जयंतीनिमित्त महानगरातील हजारो शिखबांधव महानगरातील गुरुद्वारांमध्ये सहभागी झाले होते. तसेच गुरुद्वारांना रोषणाईने सजविण्यात आले आहे. शिंगाडा तलावच्या गुरुद्वारामध्ये तर गुरुद्वाराच्या बाहेरदेखील भव्य स्क्रीन लावून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय रक्तदान शिबिर, दंतचिकित्सा कॅम्प, मॅमोग्राफी शिबिर यांसह विविध सामाजिक उपक्रमदेखील वर्षभरात आयोजित करण्यात आले होते. शिंगाडा तलाव येथील गुरुद्वारात ओमवीर सिंग, प्रभलीन कौर आणि जगदीपसिंग या कीर्तनी जथ्थ्याने विविध भजने आणि कीर्तने सादर करीत सेवा अर्पण केली.प्रदूषणविरहित उत्सववायु हा गुरू, पाणी हा पिता आणि धरती ही आई असल्याचे आपली संस्कृती सांगते. त्यामुळे या तिघांची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही, अशाच प्रकारे उत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय सर्व गुरुद्वारा प्रबंधक समित्यांनी घेतला होता. त्यानुसार स्वच्छतेवर भर देत फटाक्यांविना आणि प्रदूषणविरहित उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.श्री गुरु नानकजी यांच्या जयंतीनिमित्त शीख धर्मीयांचा सर्वोच्च पवित्र ग्रंथ मानल्या जाणाऱ्या गुरु ग्रंथ साहिबच्या पठणाला तीन दिवसांपूर्वीच प्रारंभ करण्यात आला होता. तीन दिवस त्याचे पठण झाल्यानंतर मंगळवारी सकाळी या पाठाची समाप्ती करण्यात आली. या ग्रंथामध्ये श्री गुरु नानकजी यांच्या वचनांचा अंतर्भाव आहे. पठणाचा समारोप झाल्यानंतर आरती करुन अखंड पाठाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक